अजित पवार विमान अपघातImage Credit source: social media
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अख्खा महाराष्ट्र शोकाकूल झाला. 28 जानेवारी रोजी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला येत होते, मात्र बारामती एअरपोर्टजवळ आल्यानंतर त्याचं प्लेन अचानक क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. तसेच विमानातील आणखी चौघंही ठार झाले. त्यांच्या जाण्याने अख्खी बारामतीच नव्हे तर राज्य हळहळलं. मात्र त्यांच्या मृत्यूला काही दिवस उलटल्यानंतर त्यांच्या निधनाबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.
अजित पवार यांचे पुतणे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईव दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांचा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली. तसेच अजित पवार गाटातील काही नेत्यांनीही या मुद्याला दुजोरा दिला आहे. आता अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित दादांच्या अपघाताचा खासगी गुप्तेर संस्थेकडून पास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार आहेत.
राजधानीत काय घडलं ?
गेल्या आठवड्यात ते दिल्लीला गेले होते. राजधानीत असताना रोहित पवार यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली असेही समजते. या दोन्हीपैकी एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचं काम दिलं जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणांवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थांकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा घटनाक्रम त्यांनी संपूर्ण मांडला होता. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.
अजित दादांचा हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशयही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सरकारी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला. किंवा हा तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रोहित पवार हे दोनपैकी एका संस्थेकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात जेव्हा ते दिल्ली दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी काही खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची संपूर्ण माहिती त्या गुप्तहेर संस्थांना दिली. याचा तपास देखील या संस्थाकडून करून घेतला जाणार असल्याचे समजते.
रोहित पवार यांचं महत्वाचं ट्विट
याचदरम्यान रोहित पवार यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. ” स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !” , अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 16, 2026
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



