बहुतेक पालक, ते उच्चशिक्षित असोत वा नसोत, मुलांना नेहमी समजावतात की, ‘चांगल्या संस्कारांसाठी काहीच खर्च करावा लागत नाही.’ पण अलीकडेच जेन-झीमधील एका तरुणाने मला शिकवले की, ‘हे विनम्र शब्द वापरण्याची किंमत कदाचित पृथ्वीला मोजावी लागत असेल.’ याचा अर्थ काय, असा प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा. हा धडा मला सहज मिळाला नाही. एका सार्वजनिक ठिकाणी उभा असताना मी एका जेन-झीमधील तरुणाला ऑटोरिक्षाचे भाडे देण्यासाठी मदत केली. त्याच्याकडे सुटे पैसे नव्हते म्हणून मी त्याला पैसे दिले. कारण ऑटोचालकाकडे डिजिटल पेमेंटची सुविधा नव्हती. पैसे दिल्यानंतर तो तरुण ‘थँक यू’ न म्हणताच निघून गेला. मी त्याला ऐकू जाईल अशा थोड्या मोठ्या आवाजात माझ्या मित्राला म्हणालो, ‘पाहा, आजची पिढी साधा शिष्टाचारही विसरली आहे. तो ‘थँक यू’ सुद्धा म्हणू शकत नाही का?’ हे ऐकताच तो तरुण लगेच मागे वळला आणि परत येऊन म्हणाला, ‘थँक यू, काका. हा मुद्दा हेतूचा नाही. हळूहळू ‘थँक यू’ किंवा ‘प्लीज’ न म्हणण्याची सवय लागते आहे. खरे तर मी विसरलो होतो की, मी एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी नव्हे, तर माणसाशी बोलत होतो.’ मी त्याला म्हटले, ‘माफ कर, मला समजले नाही.’ त्यावर त्याने एक रंजक स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, आमच्या पिढीला पालकांनी अनेक वर्षे शिकवलेल्या सवयी आता सोडणे कठीण जात आहे. तो हसत म्हणाला, ‘तुमच्या पिढीने आम्हाला इतके चांगले संस्कार दिले की, पाळीव कुत्र्यालाही खायला देताना ‘प्लीज’ म्हणायचे आणि घरात मदत करणाऱ्या व्यक्तीने पाण्याचा ग्लास दिला तरी ‘थँक यू’ म्हणायचे. पण आता ह्याच सवयी चॅटजीपीटी, जेमिनी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट्सशी बोलतानाही कायम राहतात. मात्र प्रत्येक अतिरिक्त शब्द म्हणजे अधिक प्रक्रिया म्हणजेच अधिक वीज वापर व पर्यावरणावर अधिक परिणाम.’ आश्चर्य म्हणजे त्याच्या म्हणण्यात तथ्य होते.संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालातही हीच चिंता व्यक्त केली गेली. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारलेल्या प्रश्नात ‘प्लीज’ किंवा ‘थँक यू’ जोडल्याने स्वतंत्रपणे फारसा परिणाम होत नाही. पण हेच रोज अब्जावधी कृत्रिम बुद्धिमत्ता संवादांमध्ये घडले तर त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षणीय ठरतो. चॅटजीपीटीच्या वापराच्या आकडेवारीवर आधारित या अहवालानुसार, प्रश्नातून केवळ ‘प्लीज’ हा शब्द काढून टाकल्यास वर्षाला सुमारे १.८ गिगावॅट-तास वीज वाचू शकते. अद्याप कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्या प्रश्नांवर प्रक्रिया करण्यासाठी किती वीज खर्च करतात किंवा किती प्रश्न ‘प्लीज’ने सुरू होतात याची सार्वजनिक आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार चॅटजीपीटीवरील एका सरासरी विनंतीसाठी सुमारे ०.४२ वॅट-तास वीज खर्च होते. ही ऊर्जा १० वॅटचा एलईडी दिवा सुमारे अडीच मिनिटे पेटवून ठेवण्यासाठी पुरेशी आहे. जागतिक स्तरावर हा आकडा आणखी मोठा आहे. केवळ चॅटजीपीटीवरच दररोज अंदाजे २.५ अब्जांहून अधिक प्रश्न प्रक्रिया केले जातात. त्यात जेमिनी, क्लॉड, कोपायलट आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींवरील विनंत्यांची भर घातली तर हा आकडा आणखी मोठा होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रश्नामधील अगदी छोटी बचतही एकत्रितपणे मोठा फायदा देऊ शकते. येथे या कथेला आणखी एक रंजक वळण मिळते. टेकरडारने अमेरिका आणि ब्रिटनमधील एक हजार लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, ७१ टक्के ब्रिटिश वापरकर्ते कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट्सशी बोलताना विनम्र भाषा वापरतात. अमेरिकेत हा आकडा ६७ टक्के होता. त्यांना विचारले की या यंत्रांना शिष्टाचार अपेक्षित नसताना त्यांच्याशी ते नम्रपणे का बोलतात तेव्हा अनेकांनी गमतीने उत्तर दिले की, भविष्यात ‘रोबोट बंड’ झाले तर आधीपासूनच चांगले संबंध ठेवलेले बरे. ही चर्चा तेव्हा अधिक गाजली. समाजमाध्यमांवर ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना विचारले की, वापरकर्त्यांनी वारंवार ‘प्लीज’ आणि ‘थँक यू’ लिहिल्यामुळे कंपनीला किती आर्थिक भार सहन करावा लागला? त्यावर त्यांचे लक्षवेधी उत्तर होते,‘कदाचित काही कोटी डॉलर योग्य कारणासाठी खर्च झाले असतील.’ फंडा असा की, शिष्टाचाराचे धडे देण्यासाठी आपण इतकी मेहनत घेतली. त्याचा मुलांना कधी विसर पडला तरी काळजी करू नका. कदाचित ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगाशी स्वतःला जुळवून घेत असतील. आणि कदाचित एखाद्या दिवशी ते असे छोटे, नम्र शब्दही तयार करतील की ते वीज बचत आणि पृथ्वीचे संरक्षणही करतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




