आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 8 मार्चला महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ वर्ल्ड कप चॅम्पियन ठरणार आहे. मात्र त्यासाठी आता बराच वेळ आहे. सध्या साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे 20 संघात सुपर 8 फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना फायनलआधी मकामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात दुसरं तिसरं कुणी नसून टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. सामन्याला आता काहीच तास बाकी आहेत त्यामुळेच चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा या मैदानात पाकिस्तान विरुद्ध दबदबा राहिला आहे. पाकिस्तान या मैदानातील टीम इंडिया विरुद्धचा शेवटचा टी 20i सामना कधीच विसरणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियम एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला आहे. भारताने त्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्या सामन्यात नक्की काय झालं होतं? तो सामना केव्हा खेळवण्यात आला होता? भारताला त्या सामन्यात विजयी करण्यात कुणी योगदान दिलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भारत-पाक सामना
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ 30 सप्टेंबर 2012 रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने सुपर 8 फेरीत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता. भारताने धारदार बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानला 130 धावांच्या आत गुंडाळलं. भारताने पाकिस्तानला 19.4 ओव्हरमध्ये 128 धावांवर गुंडाळलं.
भारतासाठी त्या सामन्यात लक्ष्मीपती बालाजी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तसेच युवराज सिंह आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेण्यात यश मिळवलं. तर इरफान पठाण आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
विराट खेळी आणि भारताचा विजय
त्यानंतर टीम इंडियाने 129 धावांचं आव्हान 18 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 2 विकेट्स गमावून 17 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. गौतम गंभीर याला भोपळाही फोडता आला नाही. ओपनर वीरेंद्र सेहवाग याने 29 धावा केल्या. त्यानंतर युवराज सिंह आणि विराट कोहली या दोघांनी भारताला विजयी केलं. विराटने सर्वाधिक आणि नाबाद 78 धावांची खेळी केली. तर युवराजने 19 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे प्रेमदासा स्टेडियममध्ये विजय मिळवला. आता टीम इंडिया 2026 साली 2012 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार करणार पाकिस्तान परतफेड करण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानतंरच स्पष्ट होईल.
शहर
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
महाराष्ट्र
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel


