महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा जाण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे शहरावरील पाणीसंकट कमालीचे तीव्र झाले आहे. राज्यभरातच पावसाची कमालीची तूट राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पावसाची तूट कमालीची वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक तूट रायगड उणे 99% आणि मुंबई शहर उणे 98% इतकी नोंदवली गेली आहे. याशिवाय मुंबई उपनगर उणे 96%, सातारा उणे 90%, अहिल्यानगर उणे 88%, संभाजीनगर उणे 87%, रत्नागिरी उणे 84%, पुणे उणे 83%, सिंधुदुर्ग व कोल्हापूर उणे 80%, सांगली उणे 56% आणि सोलापूर जिल्ह्यात उणे 52% पावसाची तूट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अद्याप मोसमी वारे पोहोचलेले नाहीत. राज्यात अवर्षणाचे सावट; जून महिन्यात मोसमी पावसाची तब्बल 81 टक्के तूट मान्सून आगमन झाले असले, तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण राज्यात अवर्षणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा निम्मा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 जून ते 20 जून या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल उणे 81 टक्के इतका अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मान्सून पोहोचलेल्या जिल्ह्यांत अद्याप कोरडीठाक परिस्थिती कायम आहे. लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता- अनुपम कश्यप आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख व हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांच्या मते, महाराष्ट्र आणि लगतच्या भागात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. लवकरच मान्सूनचा प्रवाह पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, शेजारील केरळममध्ये उणे 24%, कर्नाटकात उणे 37% तर गोव्यात उणे 73% पावसाची तूट आहे. येत्या 23 जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन तेलंगण, बिहार, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतून पुढे सरकेल. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनची महाराष्ट्रात झेप : खुळे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,तब्बल 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात घेतलेली झेप, विशेषतः अलिबाग, पुणे, सातारा आणि मराठवाड्यापर्यंत झालेली वाटचाल बळीराजासाठी नक्कीच सुखावणारी आहे. अरबी समुद्रातील अनुकूल बदल आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला मिळालेली नवी बळकटी यामुळे मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस दाखल होईल, हा आशादायी अंदाज मनाला उभारी देतो. मात्र, दुसरीकडे विदर्भात 26 जूनपर्यंत राहणारा रात्रीचा उकाडा व उष्णतेची तीव्र लाट चिंतेची बाब असून, तेथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो, असेही खुळे यांनी सांगितले. पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा घटल्याने पाणीपुरवठ्याचे संकट महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले की, धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून पुण्यातील धरणांमध्ये केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याने एक दिवसाआड पाणी कपात करण्यात आलेली आहे. पाणी टँकरचे प्रमाणदेखील मागील एक आठवड्यापासून वाढलेले असून सध्या एकूण 1665 पाणी टँकर शहरात कार्यरत आहे. पुण्याची तहान भागवणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. ऐतिहासिक आकडेवारी आणि भूतकाळातील स्थिती हवामान विभागाच्या नोंदीनुसार, यापूर्वी 1915 आणि 1932 मध्येही 20 जूनपर्यंत पुण्यात अशीच कोरडी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धात मान्सून सक्रिय झाला होता आणि चांगला पाऊस पडला होता. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, जून महिन्यात 1915 मध्ये एकूण 362 मिमी, 1932 मध्ये 79 मिमी आणि 1958 मध्ये 65 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र “एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून कमालीचा कमकुवत झाला असून, वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना भीषण उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे वीज आणि पाण्याची मागणी कमालीची वाढली आहे. दुसऱ्या बाजूला पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस आणि भात यांसारख्या खरीप पिकांची पेरणी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



