India-US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये एक नवी, मोठी अपडेट आली आहे. अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्ट शीटमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. व्हाईट हाऊसच्या फॅक्ट शीटनुसार, आता ट्रेड डीलच्या लिस्टमधून डाळी काढून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार कराराची घोषणा केली. त्यावेळी, व्हाईट हाऊसने एक फॅक्टशीट जारी केली होती, ज्यामध्ये काही मु्द्यांचा समावेश होता, जे भारतासाठी चिंताजनक ठरू शकले असते. त्यावरून अनेक सवालही उपस्थित झाले. मात्र आता अमेरिकेने ही फॅक्टशीट अपडेट केली आहे. समाविष्ट होते जे भारतासाठी काही चिंता निर्माण करू शकतात. यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
ट्रेड डीलच्या फॅक्टशीटमधून अनेक गोष्टी हटवण्यात आल्या आहेत किंवा शब्द बदलण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्वाती म्हणजे डाळ. हो, भारतासाठी सर्वात मोठी चांगली बातमी, म्हणजे डाळींचा उल्लेख पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी फॅक्टशीटमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की भारत अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करेल किंवा काढून टाकेल. मात्र आता, त्या यादीतून ‘certain pulses’ म्हणजेच ‘काही डाळी’ हे शब्द काढून टाकण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की भारताला आता अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करण्याची गरज नाही. भारतीय शेतकरी आणि डाळी उत्पादकांसाठी ही खूप चांगली बातमी आहे.
पहिला मोठा बदल डाळींचा
खरं तर, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर, अमेरिका आणि भारत यांची एका ट्रेड डीलवर सहमती झाली. त्यानंतर एक फॅक्टशीट जारी करण्यात आली. व्हाईट हाऊसने आता भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये थोडीशी सुधारणा केली आहे. मागील फॅक्टशीटमधील काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे तसेच काही शब्दरचना देखील बदलण्यात आली आहे. यातील सर्वात पहिला, सर्वात मोठा बदल म्हणजे डाळींबद्दल आहे.
दुसरा मोठा बदल काय ?
त्यातील दुसरा मोठा बदल म्हणजे 500 अब्ज डॉलर्सच्या खरेदीचे आश्वासन. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये आधी असं म्हटलं होतं की, भारत हा अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करण्यास वचनबद्ध म्हणजेच ‘committed’ आहे, म्हणजेच त्यांनी ते वचन दिलं आहे. मात्र आता हा शब्द बदलून ‘intend’ करण्यात आला आहे, याचा अर्थ त्यांचा असा विचार किंवा मानस आहे. म्हणजेच भारताने कोणतेही आश्वासन दिलेलं नाही, उलट हा एक हेतू आहे. करारानुसार हेतू बदलू शकतात, परंतु आश्वासने बदलत नाहीत.
याव्यतिरिक्त, “कृषी उत्पादने” हेही खरेदी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. आता, फक्त ऊर्जा, आयसीटी, कोळसा आणि इतर उत्पादनांचा उल्लेख आहे. याचा अर्थ कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी कोणताही दबाव नाही. सुधारित आवृत्तीमध्ये या लिस्टमधून कृषी उत्पादनांचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




