World’s Top 50 Hottest Cities Are Now Exclusively in India, Including Vidarbha's Brahmapuri!

भारतात सूर्याचा कोप! एकट्या तेलंगणात १६ जणांचा बळी; विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील ५० सर्वात उष्ण शहरे फक्त भारतातच!

World’s Top 50 Hottest Cities Are Now Exclusively in India, Including Vidarbha's Brahmapuri! नवी दिल्ली / नागपूर: संपूर्ण भारत सध्या अभूतपूर्व आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या (Severe Heat Wave) तडाख्यात सापडला आहे. उन्हाचा पारा इतका वाढला आहे की, जागतिक हवामान निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार जगातील पहिल्या ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्वच्या सर्व ५० शहरे केवळ आणि केवळ भारतातीलच नोंदवली गेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाचा प्रामुख्याने समावेश असून, ब्रह्मपुरी, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या शहरांनी उष्णतेचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या तीव्र उन्हामुळे दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात आतापर्यंत १६ लोकांचा उष्माघाताने (Heatstroke) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकट्या तेलंगणात १६ बळी; सरकारकडून आर्थिक मदत जाहीरतेलंगणा राज्यातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, कडक उन्हामुळे सात जिल्ह्यांमध्ये मिळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी आपत्कालीन बैठक घेऊन या मृत्यूंची अधिकृत पुष्टी केली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारी ११ ते ४ या वेळेत वृद्धांना, लहान मुलांना आणि गरोदर महिलांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील ब्रह्मपुरी ठरले देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एकमहाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ सध्या अक्षरशः होरपळून निघाला आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील 'ब्रह्मपुरी' (Brahmapuri) येथे उन्हाचा पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, गेल्या ११ वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे.

या तीव्र उष्णतेमुळे ब्रह्मपुरी आणि वर्धा ही शहरे जगातील व देशातील टॉपच्या उष्ण शहरांमध्ये पहिल्या काही क्रमांकावर पोहोचली आहेत. याशिवाय नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे देखील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने प्रशासनाने संपूर्ण विदर्भात ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. नागपुरात गेल्या ९ दिवसांत उष्णतेमुळे अनेक संशयास्पद मृत्यू झाले असून त्यांचा तपास सुरू आहे. ११ राज्यांमध्ये पारा ४० ते ४७ अंशांच्या दरम्यानहवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह देशातील ११ राज्यांमध्ये भीषण उष्णतेची लाट सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांमध्ये दुपारच्या आधीच तापमान ४३ अंशांच्या पुढे जात असल्याने रस्ते ओस पडत आहेत. एल निनो (El Niño) प्रवाहाच्या प्रभावामुळे यंदा उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून पुढील काही दिवस नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, लिंबू पाणी, ताक आणि ओआरएस (ORS) चा वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *