नाशिक: देशात इंधनबचतीचा नारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. परंतु, दुसरीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या संथ धोरणामुळे नाशिक महापालिकेला 'पीएम ई-बस योजने' अंतर्गत मिळणाऱ्या ५० ई-बसेस कराराअभावी रखडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारने ई-बसेस चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या 'जेबीएम इको लाइफ' या ऑपरेटर कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रखडला आहे. परिणामी, 'सिटीलिंक' प्रशासनाला वर्षभरानंतरही या ई-बसेसची केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे.
मसुदा रखडला, करार लांबला: नाशिकमधील आडगाव येथील ई-बस डेपोचे काम पूर्ण होऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. असे असूनही जेबीएम इको लाइफ कंपनीसोबत अधिकृत करार होऊ शकलेला नाही. वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच केंद्र आणि राज्य शासनाकडून अद्याप या करारनाम्याचा मसुदा अंतिम होऊन न मिळाल्याने ई-बसेसचा नाशिकमधील प्रवास लांबणीवर पडला आहे. या तांत्रिक आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे नाशिककरांना पर्यावरणपूरक प्रवासाऐवजी नाईलाजाने जुन्या डिझेल बसेसचाच वापर करावा लागत आहे.
ई-बसेससाठी आणखी वाट पाहावी लागणार:
पहिल्या टप्प्यातील ई-बसेसची रखडलेली करार प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतरच, उर्वरित ५० बसेससाठीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रशासकीय मंजुऱ्या आणि बसेस प्रत्यक्षात नाशिकमध्ये दाखल होण्यासाठी आणखी किमान ४ ते ६ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठीच्या उर्वरित ५० ई-बसेस देखील मंजूर झाल्या असून, आडगाव ट्रक टर्मिनल येथे एकूण १०० ई-बसेसच्या पार्किंग व चार्जिंगची व्यवस्था उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, जोपर्यंत शासन स्तरावरून कराराचा मसुदा मिळत नाही, तोपर्यंत नाशिककरांची ही प्रतीक्षा संपणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




