Nagpur : अधिवेशनापूर्वी मोठी राजकीय हालचाल: पडद्यामागील घडामोडीनंतर चहापान कार्यक्रमाला विरोधकांचा बहिष्कार

Nagpur : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज रविवारी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांनादेखील या चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून का बहिष्कार टाकत आहोत? याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

Mumbai : भाजप vs शिवसेना आमने–सामने! एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमुळे राजकीय वातावरण तापलं



"आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला का जात नाही आहोत? याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून सभागृह नेते म्हणून तसेच राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानाला या म्हणून पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी भास्करराव जाधव आमदार असं लिहिलं आहे. त्यापुढे लिहिलं आहे की, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात? तर ते राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला पत्र पाठवतात. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.

"दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलं आहे असं सांगायचं, पण विरोधी पक्षनेता पदाची दोन्ही पदं खाली ठेवायची. पर्यायाने ही पदं केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे. तथा परंपरेमध्ये सुद्धा आहे", असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

"एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, असं सांगितलं जायचं. पण हे साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधीमंडळाला दिले. सचिव आणि अध्यक्षांना दिले. आम्ही त्यांच्याकडून विरोधी पक्षनेताचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखीत स्वरुपात मागितली. त्यानंतर अखेर प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं", अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.

"अशा पद्धतीने कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेत नाही. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाच्यावतीने जे विरोधी पक्षनेता करता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करावी, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहाच विरोधी पक्षनेता पद खाली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात विधी मंडळात आजतागायत हा पहिला प्रसंग निर्माण झाला आहे", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

  • "आम्हाला निधी देत नाहीत, अशांसोबत चहा कसा पिणार?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
  • "लाडकी बहीण, लाडका भाऊ खड्ड्यात गेले, आता लाडका कंत्राटदार आला", अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली.
  • "सकाळ, संध्याकाळ लोकप्रतिनिधी विकत घेण्याचं काम सुरु आहे", असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी महायुतीवर केला.
  • "शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मत घेतलं, पण आता कर्जमाफीसाठी तरीख पे तारीख दिली जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *