Pune : स्वातंत्र्यदिनी पुण्यात पाणी नाही, शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद; नेमकं कारण काय?

 

Pune : पुण्यात आज काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुट्टी असल्याने महापारेषणकडून २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे भामा-आसखेड जलकेंद्र आज बंद राहणार असून, नगर रस्ता परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे थांबणार आहे.

महापारेषणकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण आणि तळेगाव परिसरातील औद्योगिक कंपन्यांना आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे. त्यामुळे महापारेषणकडून या भागातील २२० केव्ही क्षमतेच्या वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम केले जाणार आहे. या कारणास्तव शहरातील तब्बल दहा लाख पुणेकरांना पाणीपुरवठा करणारे भामा- आसखेड जलकेंद्र बंद असणार आहे. परिणामी आज संपूर्ण नगर रस्ता परिसरात पाणी बंद असणार आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला

भामा-आसखेड जॅकवेल व कुरुळी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद असेल. त्यामुळे लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व परिसरातील नागरिकांना पाण्याचा त्रास होणार आहे.

अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे महापालिकेची चांगलीच कोंडी झाली असून, प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील इतर जलशुद्धीकरण केंद्रांमधून मागणीनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *