
Pakistani Airstrikes: पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानवर एअर स्टाईक केला आहे. मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री अफगाणिस्तानच्या सीमेजवळील पक्तिका प्रांतातील बारमल जिह्यांमध्ये हवाई हल्ला झाला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे. मृतांची संख्या वाढत असल्याचेही म्हटले जात आहे.
अफगाणिस्तानच्या लमन गावासह अन्य सात गावांना हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले होते. हल्ल्यात लमनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय बारमलमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हा प्राणघाती हल्ला पाकिस्तान हवाई दलाकडून करण्यात आल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला आहे.
खामा प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली आहे. या प्रदेशामध्ये तणाव वाढत आहे. शासनाद्वारे पीडितांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय हल्ल्याच्या तपशीलांची पृष्टी करण्याच्या दृष्टीने तपास होणार आहे. तथ्यांची पूर्तता झाल्यानंतर हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल.
|
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २ दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागांचा समावेश? |
दरम्यान हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे विधान तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहे. वझिरीस्तानी निर्वासितांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वाराझमी यांच्या पोस्टनुसार, या हल्ल्यात १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात स्थानिकांसह वझिरीस्तानच्या निर्वासितांचा समावेश आहे. शोधमोहीम सुरु असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने सध्यातरी या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा हल्ला प्रामुख्याने पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेजवळील तालिबानच्या छुप्या ठिकाणांवर होता असे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सैन्यावर मागील काही महिन्यात 'पाकिस्तानी तालिबान म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)'ने हल्ले वाढवले आहेत. अफगाणिस्तान या अतिरेक्यांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
अफगाणिस्तानमधील टीटीपीच्या अतिरेक्यांची संख्या वाढत असल्याचा दावा पाकिस्तान करत असताना अफगाणिस्तान तालिबानने याला ठामपणे नकार दिला आहे. याशिवाय वझिरीस्तान हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पाकिस्तानमधील आदिवासी भागात लष्करी कारवायांना कंटाळून अफगाणिस्तानमध्ये वझिरीस्तानमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्य करत आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



