
Pune : शिवाजीनगर मतदारसंघात आजवर दुरंगी लढत होत असल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस ही पारंपरिक लढत कायम राहिली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंड पुकारले असून, या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे.
भाजपने विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली, तरी काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्यास विलंब लावला. गेल्या निवडणुकीत दत्ता बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली होती. या वेळी मनीष आनंद हेदेखील इच्छुक होते. दोन्ही इच्छुक तुल्यबळ असल्याने काँग्रेसपुढे कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न होता. शेवटच्या क्षणी बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मनीष आनंद नाराज झाले. उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.
या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मनीष आनंद यांनी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने त्यांनी जनसंपर्क वाढविला होता. त्यांची पत्नी पूजा आनंद यांच्याकडे काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष पद असल्याने त्यांनीही महिला मतदारांच्या संपर्कावर भर दिला होता. मात्र, काँग्रेसने पुन्हा बहिरट यांना उमेदवारी दिल्याने मनीष आनंद यांनी बंडखोरी केली. मनीष आनंद यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे बहिरट यांची कोंडी झाली आहे, तर विद्यामान आमदार शिरोळे यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मनीष आनंद यांची साथ दिल्याने या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
|
|
बहिरट हे २०१२ मध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये ते पराभूत झाले. मनीष आनंद हे २००८ मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत मनीष आणि त्यांच्या पत्नी पूजा हे दोघेही निवडून आले होते. त्यांचे या भागात प्राबल्य आहे. शिरोळे हे नगरसेवक हाते. त्यानंतर मागील निवडणुकीत ते आमदार झाले.
आतापर्यंत या मतदारसंघात दुरंगी लढत होत होती. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे हे १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढून मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. त्यानंतर १९७८ पासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. दिवंगत खासदार अण्णा जोशी हे १९८० आणि १९८५ मध्ये निवडून आले होते. १९९० मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी १९९० आणि १९९५ मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९९ च्या निवडणुकीत सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तोपर्यंत कोथरूडचा परिसर या मतदारसंघात होता. २००९ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कोथरूड हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी निम्हण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र निम्हण यांचा भाजपचे माजी आमदार विजय काळे यांनी पराभव केला. मागील निवडणुकीत काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या मतदारसंघात दुरंगी लढत होत होती. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे हे १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढून मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. त्यानंतर १९७८ पासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. दिवंगत खासदार अण्णा जोशी हे १९८० आणि १९८५ मध्ये निवडून आले होते. १९९० मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी १९९० आणि १९९५ मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९९ च्या निवडणुकीत सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तोपर्यंत कोथरूडचा परिसर या मतदारसंघात होता. २००९ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कोथरूड हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी निम्हण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र निम्हण यांचा भाजपचे माजी आमदार विजय काळे यांनी पराभव केला. मागील निवडणुकीत काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



