
Eknath Shinde : फेरीवाल्यांची दादागिरी ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी काही नविन राहीलेली नाही. मात्र ही दादागिरी आता एवढी वाढली आहे की नागरिकांना मारहाण करत गंभीर जखमी करण्यासही हे फेरिवाले मागे पुढे पहात नाहीत.
पालिका कर्मचारी तसेच नागरिकांना फेरिवाल्यांनी मारहाण केल्याच्या चार ते पाच घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. फेरिवाल्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन देखील त्यांना त्याचे भय राहीलेले नाही. आपली दहशत फेरिवाले कायम ठेवून असल्याचेच नुकत्याच घडलेल्या आयटी इंजिनिअर मारहाणी प्रकरणावरुन ही बाब स्पष्ट होत आहे.
|
Pune News : पुण्यातील येरवडा पुन्हा एकदा हादरलं, भर दिवसा करण्यात आला कैद्याचा खून |
कल्याण डोंबिवलीतील स्टेशन परिसर, मुख्य रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांनी काबीज केले असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा उरत नाही. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन टॉकीज गल्ली ही आपल्या मालकीची आहे अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले हे या भागात वावरत आहेत.
या जागेचे आम्ही भाडे देतो असे उघड सांगत दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनधिकृत फेरिवाले, फुटपाथ, रस्ते काबीज करणारे फेरिवाले यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी ही कारवाई केवळ दिखावेगिरी असते. ठराविक पावती फाडली की फेरीवाल्यांना त्यांचे सामान परत मिळते. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी फेरिवाल्यांचे लागेबंध निर्माण झाले आहेत. त्यांना ठराविक रक्कम दिली की ते तुमच्या सामानाला हात देखील लावत नाहीत.
कारवाई करुन सामान घेऊन गेले तरी नंतर राजकीय बड्या पदाधिकाऱ्यांच्या एका फोनवर हे सामान त्यांना परत केले जाते. दिवाळीमध्ये याचा सर्वाधिक प्रत्यय आला. रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई असताना देखील फेरीवाल्यांनी स्टॉलवर राजकीय बडे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो लावून बिनधास्त आपला व्यवसाय केल्याचे दिसून आले. केडीएमसीत नवनिर्वाचित आयुक्त आले की ते फेरिवाले हटविण्याचे आदेश काढतात, त्यानुसार अतिक्रमण विभाग तात्पुरती कारवाई करते. शहरात राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे, आयुक्त, प्रभाग अधिकारी यांचा दौरा असल्यास या परिसरातील फेरिवाले त्या त्या वेळेपुरते हटल्याचे आढळून येते. परंतू हे दौरे, सभा पार पडताच पुन्हा फेरिवाले आपला परिसर काबीज करत आहेत.
फेरीवाल्यांची दहशत एवढी का वाढली ? त्यांना कोणी खतपाणी दिले हा मुख्य मुद्दा आहे. यावर आता फेरिवाल्यांनीच बोलण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाल्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षातील पदाधिकारी, पालिका कर्मचारी, अधिकारी यांना ठराविक हप्ते जातात. स्टेशन परिसरातील दुकानदार आपल्याच दुकानातील माल या फेरिवाल्यांना विक्रीसाठी देत दुकानासमोर जागा ही उपलब्ध करुन देतात. यामध्ये बाहेरुन आलेल्या विक्रेत्यांची संख्या अधिक असून त्यांची मुजोरी वाढत आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



