
खडकवासला : कोंढवे- धावडे येथून एका २७ वर्षीय युवकाचे अपहरण केले. त्यानंतर नेपाळमधील क्रमांकावरून फोन करून २५ लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला उत्तमनगर पोलिसांनी सांगली येथून अटक केली.
याबाबत, अक्षय मोहन कदम (रा.गोरी खुर्द, ता.खानापुर जि.सांगली), विजय मधुकर नलावडे, प्रदिप किसन चव्हाण, महेश नलावडे, अमोल मोरे, रणजित भोसले (सर्व रा.तासगाव सांगली) यांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
कोंढवे- धावडे येथून वैभव श्रीकृष्ण जावध (वय २७) याचे शनिवारी संध्याकाळी घरामध्ये घुसून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर, त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर नेपाळमधील क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल केला.
“वैभवला सुखरूप सोडायचे असेल तर, २५ लाख रूपये दे, नाही तर त्याचे बरेवाईट होईल.’ अशी धमकी सारखी देत होता. याचे गांभीर्य लक्षात घेत दहशतवादी विरोधी पथकातील संग्राम केंद्रे यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करीत आरोपी सांगलीत असल्याची माहिती दिली.
|
|
अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील पोलीस उपआयुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांना ही माहिती दिली. त्यांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी सांगलीला पथक रवाना केले. त्यादरम्यान, अपहरण केलेली गाडी ही पुण्याला येत असल्याचे माहिती मिळाली.
म्हणून एक पथक खेडशिवापुर टोलनाका येथे पाठविले. तेथे आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. वैभवला तासगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे यांच्या पथकाने सांगली येथून आरोपींना ताब्यात घेतले. बंद पत्र्याच्या खोलीमधून वैभवची सुखरूप सुटका केली. त्याला पत्नी पुनम जाधव हिच्या ताब्यात दिले.
पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, अजय वाघमारे सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे किरण देशमुख, पोलीस अंमलदार संग्राम केंद्रे, समीर पवार, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरूध्द गायकवाड, सागर हुवाळे व खंडणी विरोधी पथक यांनी ही कामगिरी केली. याचा तपास फौजदार शीतल अनुसे करीत आहेत.
२५ लाख रुपयांचा अपहार केला
आरोपी अक्षय कदमकडे चौकशीत सांगितले की, ‘वैभव त्यांच्याकडे कामाला होता. त्याने २५ लाख रुपयांचा अपहार केला होता. त्यांने एक वर्षांनंतर ही पैसे परत दिले नाही.’ याबाबतची सत्यता, अपहार केल्याबाबत पोलिस तक्रार केली आहे का, हा तपास करायचा आहे. अक्षयने पैसे परत घेण्यासाठी अपहरण करणे, हा कायदेशीर मार्ग नाही.
- किरण बालवडकर, निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



