नवनीत गुर्जर यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस‎

ट्रम्प आणि टेरिफ. जग हैराण आहे. भारतही. मुद्दा असा‎आहे की आजकाल अमेरिका जगात आपले वर्चस्व‎प्रस्थापित करू इच्छिते. खरे तर ते तसे करत आहेत.‎ 1919 ते 1939 पर्यंत जगात ब्रिटन एक महासत्ता होती. परंतु‎विनासंघर्ष नाही. त्याच्या बाजूला फ्रान्स, जर्मनी, इटली,‎सोव्हिएत युनियन होते. ग्लास्तनोस्तने सोव्हिएत संघाला‎सोलून काढले. त्यात सोव्हिएत राज्ये तुकडे-तुकडे झाले.‎ते आपापसात लढत राहिले. आजही युद्धे सुरू आहेत.‎आज अमेरिका आहे. इतर कुणीही नाही. म्हणूनच ट्रम्प‎जगावर मनमानीपणा लादू इच्छितात.‎ एकेकाळी जपानने मंचुरिया तर इटलीने अ‍ॅबिसिनियावर‎आक्रमण केले आणि जर्मनीने ऑस्ट्रिया आणि‎चेकोस्लोवाकियावर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते.‎त्याचप्रमाणे ट्रम्पदेखील जगावर मनमानी कर लादतील‎आणि शीतयुद्धादरम्यान अनेकदा असहाय असलेले‎संयुक्त राष्ट्र जुन्या राष्ट्रसंघाप्रमाणे संघर्ष करत राहील,‎असे ट्रम्प यांना वाटते.‎ भारतातही या मुद्द्यावर विविध विधाने, आरोप- प्रत्यारोप‎केले जात आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष‎दोघेही एकमेकांवर आक्रमक आहेत. भारतात गुरू ‎‎गोरखनाथ आणि त्यांच्या योगींबद्दल अनेक कथा आहेत. ‎‎गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर एकेकाळी दाट झाडींनी ‎‎व्यापलेले होते. एक कथा अशी आहे की एका नेपाळी ‎‎सौंदर्यवतीने गुरू गोरखनाथांना जेवणासाठी आमंत्रित केले ‎‎होते. तिला माहीत होते की योगी फक्त खिचडी खातात.‎तिने पक्वानांप्रमाणेच खिचडीचे पान मांडले. दूर बसलेल्या ‎‎गुरू गोरखनाथांना त्या महिलेच्या मनात काहीतरी गडबड ‎‎जाणवली. ते गोरखपूरजवळील दाट झाडीत ध्यानस्थ‎बसले. सुंदरी त्यांची प्रतीक्षा करून कंटाळली. ती दररोज ‎‎खिचडी शिजवायची आणि वाढायची... पण गोरख आले ‎‎नाहीत. दगडाच्या चुलीवर खिचडी बनवताना ती स्वतः‎जणू दगडासारखीच होऊन गेली. पण गोरख कधीच‎आले नाहीत. सुंदरीचे अपार दुःख त्या दगडांमधून गरम ‎‎पाण्याच्या झऱ्याद्वारे वाहू लागले. तेथे आजही खिचडीचे‎भांडे शिजवले जाते.‎ भारतातही सत्तासुंदरी खिचडी शिजवत आहे किंवा‎खिचडी सत्तेसाठी शिजवली जात आहे, असेही म्हणता ‎‎येईल.‎ काँग्रेस म्हणत आहे की ट्रम्प यांच्या दबावाखाली पंतप्रधान ‎‎मोदींनी भारतातील शेतकऱ्यांना गहाण ठेवले आहे. त्यांनी‎जवळपास सगळा डेटा शेअर केला आहे. ही फसवणूक‎आहे. धूर्तता आहे. पण काँग्रेसच्या दाव्याला कुणीही महत्त्व‎देत नाही. वास्तविक काँग्रेसला आधीच इतकी‎नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे की लोक ते ऐकायला‎तयार नाहीत. एक काळ असा होता की काँग्रेस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक शेताच्या मातीत‎खोलवर रुजली आहे, असे तेव्हा म्हटले जाई. आता असे‎दिसते की काँग्रेसला त्याच शेतांच्या मातीने गिळंकृत केले‎आहे. हा काळाचा महिमा आहे! कदाचित काँग्रेसचेही‎नशीब पालटेल! कारण काँग्रेसला एकेकाळी फीनिक्स‎वंशाचा पक्ष म्हटले जात असे. फीनिक्स हा प्रत्यक्षात एक‎पौराणिक पक्षी आहे. तो स्वतःच्या राखेतून पुनर्जन्म घेतो.‎असे म्हटले जाते की फीनिक्स हा एक महाकाय पक्षी‎आहे. त्याची चोच लांब, त्यात लहान छिद्रे आहेत.‎आयुष्य संपत आले आहे असे त्याला वाटते तेव्हा तो‎सूर्याच्या दिशेने झेपावतो आणि भस्म होतो. काही‎कथांनुसार हा पक्षी वृद्धत्वाचा टप्पा गाठतो तेव्हा तो काही‎लाकडे गोळा करतो. त्याच्या ढिगाऱ्यावर बसून सुंदर सूर‎आळवतो. त्या क्षणी चोचीतील छिद्रांमधून ठिणग्या उठू‎लागतात. त्या वेळी हा पक्षी बसलेला लाकडाचा ढिगाराही‎पेट घेतो. पक्षी आगीत जळून राख होतो. स्वाती नक्षत्राच्या‎वेळी पावसाचे थेंब त्या राखेच्या ढिगाऱ्यावर पडतात तेव्हा‎एक नवीन फीनिक्स जन्माला येतो.‎ कथेचे सार असे की प्रत्येक जीव, स्वतःच्या संघर्षाच्या‎आगीत तावून-सुलाखून निघाल्यावर याच राखेतून‎फीनिक्ससारखा पुनर्जन्म घेतो. त्यामुळे काँग्रेस पक्षदेखील‎फीनिक्स वंशाचा आहे, असे गृहीत धरता येईल. हा मुद्दा‎अलाहिदा की राजकीय क्षितिजावर अशाी शक्यता सध्या‎तरी दिसत नाही. आता विरोधी पक्षही सामूहिक प्रयत्न‎गरजेचे आहेत, असे म्हणू लागले आहेत. नेत्याचा चेहरा‎निरर्थक आहे. अखिलेश यादव यांचे विधान कदाचित‎राहुल गांधींच्या नेतृत्वाचा संदर्भ देणारे असावे.‎ आगीतून निघाल्यावर...‎संघर्षाच्या आगीत भडकल्यानंतर‎स्वतःच्याच राखेतून पुनर्जन्म घेणारा‎प्रत्येक जीव फीनिक्स पक्ष्यासारखा‎असतो. म्हणूनच काँग्रेसही फीनिक्स‎वंशातील आहे, असे मानले जाऊ शकते.‎कमीत कमी अशा प्रकारची अपेक्षा तरी‎करता येऊ शकते.‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *