मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता हाच वाद मिटवण्यासाठी ठाकरे गटाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाने मनसेला याबद्दलचा प्रस्ताव दिल्याचे बोललं जात आहे. सध्या यावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरुन ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नव्या प्रस्तावावर आणि दोन्ही पक्षांतील समन्वयावर सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण झालेला पेच सुटणार की नाही, या प्रस्तावाला मनसेकडून होकार मिळणार की नाही, याबद्दलची माहिती समोर येणार आहे.
नेमका वाद काय?
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील 3 स्वीकृत नगरसेवकांची नावे प्रशासनाकडे सादर केली आहेत. मात्र, यामध्ये मनसेला स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे मनसेकडून वारंवार युती धर्म पाळला गेला नसल्याची टीका ठाकरे गटांवर केली जात आहे. कोत्या मनोवृत्तीची माणसं असा घणाघातही मनसेने केला आहे. याबद्दल मनसेने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या ऑफरने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या वादावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेचे राजकारण वेगळे असते. मी वैयक्तिकरित्या या प्रक्रियेत पडत नाही, पण आमची युती आजही टिकून आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे सांगत त्यांनी वादावर थेट भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान आता याप्रकरणी मनसे काय निर्णय घेणार, ठाकरेंच्या प्रस्तावावर होकार कळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




