मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता हाच वाद मिटवण्यासाठी ठाकरे गटाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाने मनसेला याबद्दलचा प्रस्ताव दिल्याचे बोललं जात आहे. सध्या यावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरुन ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नव्या प्रस्तावावर आणि दोन्ही पक्षांतील समन्वयावर सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण झालेला पेच सुटणार की नाही, या प्रस्तावाला मनसेकडून होकार मिळणार की नाही, याबद्दलची माहिती समोर येणार आहे.
नेमका वाद काय?
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील 3 स्वीकृत नगरसेवकांची नावे प्रशासनाकडे सादर केली आहेत. मात्र, यामध्ये मनसेला स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे मनसेकडून वारंवार युती धर्म पाळला गेला नसल्याची टीका ठाकरे गटांवर केली जात आहे. कोत्या मनोवृत्तीची माणसं असा घणाघातही मनसेने केला आहे. याबद्दल मनसेने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या ऑफरने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या वादावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेचे राजकारण वेगळे असते. मी वैयक्तिकरित्या या प्रक्रियेत पडत नाही, पण आमची युती आजही टिकून आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे सांगत त्यांनी वादावर थेट भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान आता याप्रकरणी मनसे काय निर्णय घेणार, ठाकरेंच्या प्रस्तावावर होकार कळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
[embedded content]
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

