New Zealand vs Pakistan Match Abandoned RainImage Credit source: @BLACKCAPS X Account
क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना हा पावसामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला आहे. सुपर 8 फेरीतील या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला सुरुवातच झाली नाही. सामना थांबेल आणि खेळाला सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांसह दोन्ही संघांच्या खेळाडूंनी होती. मात्र अखेर हा सामना पावसाने जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे.
पावसामुळे नाणेफेकीला विलंब
नियोजित वेळेनुसार कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी साडे सहा वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे 6 वाजून 33 मिनिटांनी टॉस झाला. सलमान आघा याने न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. टॉसनंतरही पाऊस बसरत होता. मात्र पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल, हीच आशा स्टेडियममधील चाहत्यांना होती. मात्र ही प्रतिक्षा लांबतच चाललेली.
पावसाने 1 तासा वाया घालवला. रात्रीचे 8 वाजले. त्यामुळे इथून ओव्हर कमी होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र सामना सुरु होण्याची चिन्हं काही दिसत नव्हती. तसेच डीएलएसनुसार सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5 षटकांचा खेळ व्हावा लागतो. किमान 5 षटकांचा खेळ होण्यासाठी 10 वाजून 16 मिनिटं ही कट ऑफ वेळ होती. त्यामुळे या दरम्यान पाऊस थांबेल आणि खेळपट्टी कोरडी होऊन खेळाला सुरुवात होईल, या प्रतिक्षेत चाहते होते. मात्र तसं काही झालंच नाही. त्यामुळे अखेर आयसीसीने 140 मिनिटांचा खेळ वाया गेल्यानंतर 9 वाजून 20 मिनिटांनी सामना रद्द करत असल्याचं जाहीर केलं. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ
दरम्यान सेमी फायनलसाठी सुपर 8 मधून 4 संघ पात्र ठरणार आहेत. सेमी फायनलच्या हिशोबाने सुपर 8 फेरीतील प्रत्येक सामना हा करो या मरो असा आहे. त्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा पहिलाच सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे दोन्ही संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 सामने कोणत्या स्थितीत जिंकावे लागणार आहेत. तर दोन्ही संघांसाठी एकही पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. अशात आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ सुपर 8 मोहिमेतील आपल्या पुढील दोन्ही सामन्यांत कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
शहर
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
महाराष्ट्र
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




