महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद झाल्याची आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांत शंभरहून अधिक शाळा कमी झाल्या असून, 57 शाळा धोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र, इंग्रजी शाळा वाढल्या म्हणून मराठी शाळा संपल्या, हा निष्कर्ष सोपा असला तरी तो अर्धवट आहे. शिक्षण क्षेत्रातही मागणी आणि पुरवठा यांचेच गणित लागू होते. पालक तिथेच जातात जिथे त्यांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित वाटते. जर दुसरी रेघ छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी रेघ आखावी लागते; ती पुसून टाकून उपयोग होत नाही. म्हणून इंग्रजी माध्यमाला दोष देण्याऐवजी मराठी शाळांना अधिक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह बनवणे हाच मार्ग आहे. मी स्वतः इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतो, मग मी मराठी शाळांच्या भवितव्यावर का भाष्य करतोय, असा प्रश्न काहींना पडू शकतो. परंतु, शिक्षण ही केवळ दोन माध्यमांमधील स्पर्धा नसून, ती समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक आरोग्याशी जोडलेली बाब आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीचा सदस्य आणि दोन दशकांचा शैक्षणिक अनुभव असलेला अभ्यासक म्हणून या प्रश्नाकडे पाहताना मला त्यात भाषेचा संघर्ष दिसत नाही; मला व्यवस्थेतील उणिवा आणि सुधारण्याची संधी दिसते. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही; देशभरातील प्रादेशिक भाषांमधील शाळा अशाच आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. नागपूर खंडपीठाने स्थानिक भाषांतील शाळांसाठी ठोस धोरणात्मक आराखडा सादर करण्याची गरज व्यक्त केली आहे. घटती पटसंख्या, शिक्षकांची कमतरता आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. पालकांचा विश्वास ढासळला की ते पर्याय शोधतात—ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरण मातृभाषेत शिक्षणावर भर देते, कारण प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यास मुलांचा संकल्पनात्मक पाया भक्कम होतो, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. परंतु, मातृभाषा टिकवायची असेल तर आधुनिकतेची जोड द्यावी लागेल. मराठी शाळांनी स्टेम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंग्रजी संभाषण कौशल्य यांचा समन्वय साधत आपली गुणवत्ता सिद्ध करावी. दर महिन्याला ‘ओपन क्लास डे’ घेऊन पालकांना प्रत्यक्ष अध्यापन दाखवणे, कमी पटसंख्या असलेल्या शाळांना सुधारण्यासाठी वेळ आणि आर्थिक पाठबळ देणे आणि पायाभूत सुविधांमध्ये ठोस गुंतवणूक करणे ही तातडीची पावले आहेत. सीएसआरद्वारे शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारणे तसेच दीर्घकालीन पातळीवर अर्ली वॉर्निंग डॅशबोर्ड, पारदर्शक डेटा आणि शाळा बंद करण्यापूर्वी पालक सुनावणी व संक्रमण योजना बंधनकारक करणे आवश्यक आहे. दरवर्षी जिल्हानिहाय श्वेतपत्रिका प्रकाशित करून जबाबदारी निश्चित करता येईल. आजचा प्रश्न असा नाही की, कोणती भाषा जिंकते. प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, पालकांचा विश्वास आणि शिक्षणाची गुणवत्ता जिंकते का? दोषारोपांनी शाळा वाचत नाहीत; त्या वाचतात योग्य डेटा, स्पष्ट धोरण आणि प्रामाणिक कृतीमुळे. मराठी शाळा टिकवण्याचा आराखडा हा भाषा, गुणवत्ता, अर्थसहाय्य, द्विभाषिक कौशल्य आणि पालकांचा विश्वास या पाच स्तंभांवर उभा राहायला हवा. आणि तो उभारण्यासाठी आज काम करणे आवश्यक आहे. आज आपण ठोस पावले उचलली नाहीत, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.) तरीही मराठी शाळा संपल्या हा निष्कर्ष अर्धवटशिक्षण ही केवळ कोणत्या माध्यमातून मुले शिकतात, यातील स्पर्धा नाही; तोसमाजाची जडणघडण व बौद्धिक आणि सांस्कृतिक आरोग्याशी जोडलेला मुद्दा आहे. याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणेदेखील आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




