नुकतीच ममता बॅनर्जी यांना ‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्याच्या मागणीने एका नवीन वादाला जन्म दिला. हा वाद या प्रश्नाभोवती केंद्रित आहे की, हा समूह अद्याप आपला नेता का निवडू शकलेला नाही. 2023 मध्ये या आघाडीच्या स्थापनेनंतर 3 वर्षे होऊन गेली आहेत, परंतु 26 सदस्यीय या आघाडीसाठी महत्त्वाचे काम अद्याप अपूर्णच आहे. आघाडीत नवीन ऊर्जा भरण्यासाठी व दिशा देण्यासाठी एखादा समन्वयक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दुसरा प्रश्न या मुद्द्याशी संबंधित आहे की, स्वतःमधील विरोधाभासानंतरही सध्याच्या स्वरूपात ‘इंडिया’ समूहाची प्रासंगिकता काय आहे आणि तो एनडीएला आव्हान देण्याचे प्रभावी माध्यम बनू शकतो का? तिसरा प्रश्न - ज्यावर जाहीरपणे कमी चर्चा होते - तो म्हणजे, विरोधी पक्षांकडे ‘इंडिया’ व्यतिरिक्त एनडीएचा मुकाबला करण्यासाठी इतरही मार्ग आहेत का? कारण, विरोधी पक्षांच्या स्वतःच्या मर्यादा आणि प्रादेशिक संघर्ष आहेत. अशा स्थितीत, प्रादेशिक पक्षांनी स्वतःच्या स्तरावर एक वेगळा पर्याय किंवा संघीय आघाडी निर्माण करण्याच्या दिशेने वाढण्याची गरज आहे. ‘इंडिया’ आघाडीचा अद्याप कोणताही नेता निवडला जाऊ शकलेला नाही, कारण कोणत्याही एका नावावर सहमती होऊ शकलेली नाही. ममता यांना या गटाचे नेते बनवण्याचा विचार सर्वात आधी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांनी मांडला होता. नंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनीही तो उचलून धरला. परंतु हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही. स्वाभाविकपणे, काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनीच ही भूमिका बजावावी असे वाटते. ममता बॅनर्जी या प्रादेशिक नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाकडे लोकसभेत 29 जागा आहेत. दुसरीकडे, घसरण होऊनही काँग्रेसकडे लोकसभेत अद्याप 101 जागा आहेत व त्यांची उपस्थिती देशभर आहे. प्रादेशिक पक्षांना हे अधिक मान्य असेल की, ‘इंडिया’चे नेतृत्व एखाद्या राज्यस्तरीय नेत्याच्या हातात असावे. भाजपच्या राजकारणाला विरोध असूनही, त्यांना अशी भीती वाटते की आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे गेले तर काँग्रेस पुन्हा प्रबळ होईल व त्याचा फटका त्यांनाच बसेल. गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांचा विस्तार काँग्रेसच्या कमकुवत होण्यानेच झाला आहे. ममता यांचे नाव वारंवार समोर येते कारण त्यांच्याकडे राजकीय यशाचा भक्कम रेकॉर्ड आहे. 1999 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि हळूहळू बंगालमध्ये काँग्रेसची जागा घेतली. 2011 मध्ये त्यांनी स्वबळावर त्या डाव्या सरकारला सत्तेतून बाहेर केले, जे राज्यात 33 वर्षांहून अधिक काळ टिकून होते. पण अडचण अशी आहे की, त्यांचे राजकीय भांडवल मुख्यतः एकाच राज्यापुरते मर्यादित आहे. ममता किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक नेत्याच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसला असलेल्या आक्षेपांमुळेच हा प्रश्न निर्माण होतो की, प्रादेशिक पक्षांनी एखाद्या संघीय आघाडीच्या रूपात एकत्र यावे आणि काँग्रेसला त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावे का? भूतकाळातही असे विचार समोर आले आहेत. काँग्रेस स्वतः संभ्रमात आहे. एकीकडे तिला स्वबळावर पुढे जाऊन स्वतःला पुनरुज्जीवित करायचे आहे आणि दुसरीकडे भाजपला हरवण्याच्या मोठ्या ध्येयासाठी प्रादेशिक पक्षांच्या मागण्यांशी तडजोड करण्याचा दबावही आहे. 2029 पर्यंत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा प्रश्न आहे, तिथे जागांचे वाटप साधारणपणे राज्यस्तरावरच ठरते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशात ही चर्चा राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात होईल. त्यात ममतांची कोणतीही भूमिका नसेल. त्याचप्रमाणे, अखिलेश हे ममतांना बंगालमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी तयार करू शकतील, हेदेखील शक्य नाही. भूतकाळातही प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनवली होती, जिला ‘राष्ट्रीय आघाडी’ म्हटले गेले. याची स्थापना व्ही.पी. सिंग यांनी केली होती. 1989 मध्ये ते राजीव गांधींना सत्तेतून हटवून केंद्रात सरकार बनवण्यात यशस्वी झाले होते. 1996 मध्ये त्यांनी एक पाऊल पुढे टाकले, जेव्हा केंद्रात ‘संयुक्त आघाडी’चे सरकार बनले - या वेळी काँग्रेसच्या पाठिंब्याने. त्या वेळी त्याला ‘मुख्यमंत्र्यांचे सरकार’ म्हटले गेले होते, कारण त्यात सहभागी असलेले अनेक नेते राज्यांतील पक्षांचे प्रमुख आणि प्रभावशाली प्रादेशिक चेहरे होते. परंतु आतापर्यंत प्रादेशिक पक्षांची कोणतीही आघाडी स्वबळावर केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचलेली नाही - 1989 मध्ये त्यांना काँग्रेसला हरवण्यासाठी भाजप आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागली होती किंवा 1996-97 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) संघीय आघाडीचा विचार समोर येत आहेप्रादेशिक पक्षांना अशी भीती वाटते की, आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच्या हातात गेले तर काँग्रेसचे पुनरुज्जीवन सुरू होईल आणि त्याची किंमत प्रादेशिक पक्षांनाच मोजावी लागेल. प्रादेशिक पक्षांचा विस्तार काँग्रेसच्या किमतीवरच झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




