काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चुलत भावाचे लग्न होते. आमच्या पिढीतील हे पहिले लग्न होते. आम्ही चुलत भावंडे इतके उत्साहित होतो की आम्ही मद्रास (आता चेन्नई) मध्ये जमलो आणि तयारीला लागलो. पण नेहमीच आनंदी राहणारी चुलत बहीण अचानक आम्हाला टाळायला लागली. वास्तविक तिचे लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपले होते. ती नेहमीच तिचा फोन घेऊन तिच्या बंद खोलीत बसायची. तू प्रेमात पडली आहेस, असे आम्ही तिला चिडवू लागलो. ती काहीशी रागात आणि लाजेने प्रतिक्रिया द्यायची. पण आजोबांनी आम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगितली. तेव्हा आम्हाला समजले की आमचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले, तिला वेदना होत आहेत. तिला त्रास देऊ नका. ती तिच्या जुन्या शाळेतील ट्रॉफी आणि फोटो अल्बमची क्रमवारी लावत आहे. ती तिच्या नवीन घरासाठी काही सुटकेसमध्ये ते सगळे बसवू शकत नाही. तुम्ही तिला त्रास देऊ नका. जा आणि तिला पॅक करण्यास मदत करा. शिवाय तिच्या आई-वडिलांना सोडून नवीन जोडीदार शोधण्यातही तिचा संघर्ष सुरू आहे. त्या दिवशी आजोबांनी जबाबदारी घेतली. मी माझ्या भावंडांत सर्वात मोठा असल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत नेले. तिच्या खोलीत गेलो. ते तिच्याशी तासभर बोलले. त्यांनी सुंदरपणे समजावून सांगितले की ती आता आपल्या कुटुंबात नवीन सदस्य जोडत आहे. ते म्हणाले, “एखाद्या नवीन व्यक्तीशी लग्न करणे म्हणजे पालक गमावणे नाही तर एका संरक्षित मुलीची भूमिका ओलांडून दोन्ही कुटुंबांची काळजी घेऊ शकणारी जोडीदार बनणे. मी त्यांच्या संभाषणाची शेवटची ओळ कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, “लग्न म्हणजे फक्त एक नवीन व्यक्ती शोधणे नाही तर ते जुन्या व्यक्तींना सोडून देणेदेखील आहे. उदाहरणार्थ- मी किंवा दुसरे कुणी किंवा अगदी जुने शाळेचे अल्बम. माझ्या बहिणीने त्यांचे सगले एेकले. मग आजोबांना मिठी मारली आणि तिला रडू कोसळले. आजोबांनी तिला पाच मिनिटे मोकळेपणाने रडू दिले. त्याच दिवशी मला तिच्यात अचानक बदल दिसला. तिच्या सगळ्या वस्तू आता फक्त दोन सुटकेसपुरत्या मर्यादित होत्या. त्याच संध्याकाळी ती हसत आणि खेळत परतली. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आजोबांचा तो सखोल सल्ला दशकांनंतर माझ्या मदतीला आला. मी माझ्या मुलीला त्याच परिस्थितीत पाहिले. तेव्हा तो उपयोगी आला. माझी मुलगी तिचा लग्नाचा पोशाख निवडू शकत नव्हती. तेव्हा मी तिलाही तेच म्हटले. ती अनेकदा तिच्या आईसोबत बुटीकमध्ये जायची. सुंदर लेहेंगा पाहायची आणि रिकाम्या हाताने परतायची. तिला निळ्या रंगाचा योग्य रंग सापडत नाही, अशी तक्रार करायची. 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या “लव्हज लेबर हाऊ टू ब्रेक अँड मेक द बॉन्ड्स ऑफ लव्ह’ या पुस्तकातील चांगल्या लग्नाबद्दलची उत्कृष्ट माहिती वाचल्यावर मला ही घटना आठवली. त्यात प्रसिद्ध मनोविश्लेषक आणि लेखक स्टीफन ग्रोझ यांनी “सोफी” च्या मध्यवर्ती पात्राभोवती प्रेम, लग्न, समज आणि गैरसमज यांच्या विविध पैलूंचा शोध घेतला आहे. आपण ऐकायला शिकतो तेव्हा आपले नाते आपल्याला काय शिकवू शकते, हे त्यांनी त्यात मांडले. रुग्णांशी 40 वर्षांहून अधिक काळ झालेल्या संभाषण-संवादावर आधारे ते ही बाब स्पष्ट करतात. ते पाश्चात्त्य जगातून आले असल्याने विवाहांमध्ये अनेकदा अस्थिरता आणि घटस्फोटाचा अनुभव येतो. आपण आपल्या जोडीदारांचे ऐकायला शिकतो तेव्हा नाते काही गोष्टी शिकवू शकते. उदाहरणार्थ- पती अचानक त्याच्या कामाचा आनंद घेऊ लागतो तेव्हा जोडप्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. ग्रोझ सल्ला देतो की कामावरील या नवीन प्रेमाबद्दल भांडण्याऐवजी दोन्ही भागीदारांनी ते बोलून दाखवावे. कारण “रोमान्स देखील काम आहे आणि त्यासाठी दोघांनाही कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.’
फंडा असा की, प्रेमातील श्रम हे आयुष्यभराचे काम आहे. आपण एकमेकांचे अधिक ऐकतो तेव्हा त्याचे फळ आणखी गोड होते. कधीकधी आपण आपल्या उणिवांकडेही लक्ष दिले पाहिजे. कारण यामुळे अनेकदा नवीन मार्ग मिळू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- महाराष्ट्र: रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप! तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं, शिंदेसेनेच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




