कालपर्यंत ज्यांना 'अनपढ गुंडांची पार्टी' म्हणायचे, तीच आता 'माझी पार्टी' झाली! राघव चड्ढा आणि ही मोठी आयरोनी

कालपर्यंत ज्यांना 'अनपढ गुंडांची पार्टी' म्हणायचे, तीच आता 'माझी पार्टी' झाली! राघव चड्ढा आणि ही मोठी आयरोनी


कालपर्यंत ज्यांना 'अनपढ गुंडांची पार्टी' म्हणायचे, तीच आता 'माझी पार्टी' झाली! राघव चड्ढा आणि ही मोठी आयरोनी२४ एप्रिल २०२६. भारतीय राजकारणात एका नव्या ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा रंगली. आम आदमी पार्टीचे (AAP) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत एकूण सात राज्यसभा खासदार (AAP च्या १० पैकी सुमारे दोन-तृतीयांश) भाजपमध्ये विलीन झाले. हा फक्त पक्षांतर नाही, तर ‘भ्रष्टाचार विरोधी’ नारा देणाऱ्या पक्षातील नैतिकतेचा अंतिम पतन दिसतोय.

घटना आणि तथ्य
- राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंह, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी राजीनामा दिला.
- भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांच्या उपस्थितीत चड्ढा यांनी पक्ष प्रवेश केला.
- चड्ढा म्हणाले, “आप’मध्ये प्रामाणिक राजकारण संपले आहे, पक्ष मूळ मूल्यांपासून दूर गेला आहे.”

पण इथे एक मोठी आयरोनी आहे.
काही वर्षांपूर्वी राघव चड्ढा यांनी भाजपला “अनपढ़ गुंडों की पार्टी” (अशिक्षित गुंडांची पार्टी) म्हटले होते. तो जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या पक्षाला ते ‘गुंडांचा’ म्हणत होते, त्याच पक्षात आज ते सामील झाले आहेत. हा बदल ‘परिपक्वता’ आहे की ‘सत्तेची हाव’? हे प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

आप चा नैतिक पतन
आप २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून उदयास आला. “पारदर्शकता, जनसेवा, सत्ता नाही” हे ब्रीद होते. मात्र दिल्लीतील सत्ता मिळाल्यावर पक्षावर भ्रष्टाचार, कुटुंबवाद, एकछत्री नेतृत्व (केजरीवाल) आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप वाढले. राघव चड्ढा यांच्यासारख्या सुशिक्षित, बोलक्या नेत्याला पक्ष सोडावा लागणे हे आपसाठी मोठा नैतिक धक्का आहे.

पंजाब २०२७ च्या निवडणुकीपूर्वी ही फूट पक्षाला जवळजवळ संपवणारी ठरू शकते. भगवंत मान यांनी “BJP ज्यांच्याशी हात मिळवते त्यांना संपवते” असे म्हटले, तरी वस्तुस्थिती अशी आहे की आप आता संसदेत आणि जनमानसात कमकुवत झाला आहे.

राघव चड्ढा : संधीसाधूपणा की वास्तववाद
राघव चड्ढा हे पूर्वी आपचे ‘चेहरे’ होते. ते बोलके, मध्यमवर्गीय आणि ‘ईमानदार’ इमेजचे प्रतीक होते. मात्र आता ते ज्या पक्षाला ‘गुंडांचा’ म्हणत होते, त्याच्यात सामील झाले. हा बदल ‘देशातील स्थिर सरकार’ पाहून झाला, की वैयक्तिक राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी?

राजकारणात U-Turn सामान्य आहेत, पण ज्यांनी स्वतः नैतिकतेचा नारा दिला, त्यांचा हा बदल फारसा प्रेरणादायी वाटत नाही. आज ते भाजपला ‘स्थिर’ म्हणतात, उद्या काय म्हणतील याची गॅरंटी नाही.

राघव चड्ढा यांचे पक्षांतर हे आप च्या अंतर्गत संकटाचे दर्शन घडवते. ज्या पक्षाने ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’चा नारा दिला, तोच पक्ष आता स्वतः अंतर्गत भ्रष्टाचार आणि फुटीने ग्रासला गेला आहे.

राजकारणात सत्ता आणि नैतिकता यांचा समतोल साधणे कठीण आहे. पण ज्यांनी एकदा ‘गुंडांची पार्टी’ म्हटले, ते स्वतः त्या पक्षात जाणे हे फक्त ‘परिपक्वता’ नव्हे, तर राजकीय सुविधावाद (संधीसाधूपणा) दिसते.
- विश्वजीत माने



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *