T20 World Cup 2026: भारताचा सामना झिम्बाब्वे की श्रीलंकेशी! सुपर 8 फेरीपूर्वी ट्विस्ट Image Credit source: BCCI/Zimbabwe Cricket Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. तसेच सुपर 8 फेरीतील सात संघही ठरले आहे. भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका हे संघ सुपर 8 फेरीत पोहोचले आहे. तर एका संघासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस आहे. पाकिस्तान नामिबिया सामन्यानंतर यापैकी एका संघाचा निकाल लागेल. पण त्या आधीच सुपर 8 फेरीतील संघांचं दोन गटात वर्गीकरण झालं आहे. सुपर 8 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत हे संघ आहेत. तर ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटात पाकिस्तान किंवा अमेरिकेची एन्ट्री होईल. पण या गटात एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गट ब मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा सामना व्हायचा आहे. तसेच या सामन्यानंतर या गटात उलथापालथ होऊ शकते. मात्र असं असतानाही भारत असलेल्या गटात झिम्बाब्वेला स्थान मिळालं आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 ग्रुप 1 मध्ये अ, क आणि ड गटातील टॉप संघ आहेत. यात भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. पण ब गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेला या गटात स्थान दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा साखळी फेरीतील सामना व्हायचा आहे. हा सामना जिंकणारा संघ टॉपला राहील. त्यामुळे टॉपला असणारा संघच या गटात असायला हवा होता. मग असं काय झालं की श्रीलंका संघ टॉपला असला तरी झिम्बाब्वेच या गटात खेळणार आहे. चला जाणून घेऊयात
भारताच्या गटात झिम्बाब्वे का?
स्पर्धेपूर्वीच आयसीसीने क्रमवारीच्या आधारावर सुपर 8 फेरीतील संघांचे स्थान ठरवले होते. या संघांना सुपर 8 टप्प्यात पूर्वनिर्धारित स्थान देण्यात आले होते, त्यामुळे गटात कोणतंही स्थान मिळवलं असतं तर त्या क्रमवारीच्या आधारावरच विभागणी होणार होती. यात ग्रुप 1 मध्ये भारताला स्थान दिलं होतं. तर ग्रुप 2 मध्ये श्रीलंका असणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात लढणार हे आधीच स्पष्ट होतं. झिम्बाब्वेच्या जागी जर ऑस्ट्रेलिया संघ पात्र ठरला असता तर भारताच्या गटात असता. कारण एखाद्या क्रमावारीतील संघाची जागा बिगर सीडेड संघाने घेतली तर तो त्या संघाची जागा घेईल, असं ठरलं होतं.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

