
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे रोजी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवार म्हणाले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
शरद पवार पुढे म्हणाले की, 1 मे1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं 1 मे सोबत माझं वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.
सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली, अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले होते. निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांच्या निर्देशानुसार ती 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे रोजी मिळणार आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल असं म्हटलं जातंय.
शहर
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.
- अवैध सावकारीला आता चाप! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; शिक्षेची तरतूद ५ वरून ७ वर्षांवर!
- कोल्हापुरात पावसाचा जोर; ५ बंधारे पाण्याखाली, तर हिरण्यकेशी नदीचा पर्यायी पूल खचल्याने वाहतूक विस्कळीत!
महाराष्ट्र
- भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.
- अवैध सावकारीला आता चाप! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; शिक्षेची तरतूद ५ वरून ७ वर्षांवर!
- कोल्हापुरात पावसाचा जोर; ५ बंधारे पाण्याखाली, तर हिरण्यकेशी नदीचा पर्यायी पूल खचल्याने वाहतूक विस्कळीत!
- वयोवृद्ध शेतकऱ्याला आधार; तीन तरुणांनी खांद्यावर जु घेत नांगरणी केली, घडलं माणुसकीचं दर्शन!
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



