
Satara : वाहत्या पाण्याबरोबरच आजूबाजूचा काठ समृद्ध करणाऱ्या नद्या, वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे त्या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रांना गटारांचे स्वरूप आले असून, तेच पाणी शुद्धीकरणानंतर शहराच्या पूर्वभागास प्राधिकरणाच्या वतीने वर्षानुवर्षे पुरविण्यात येत आहे.
शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी सातारा पालिका प्रकल्प उभारत असली, तरी त्याची उभारणी संथगतीने सुरू आहे. बदल्या काळानुरूप वाढणारी, विस्तारणारी गावे, शहरे, वाढलेले औद्योगिकीकरण व उभे राहिलेल्या कारखानदारीमुळे मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या नद्यांचे जलचक्र धोक्यात येत चालले आहे.
अजिंक्यतारा, यवतेश्वर आणि पेढ्याचा भैरोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या साताऱ्यातून डोंगररांगातून आलेले नैसर्गिक ओढे आणि नाले वाहतात. या ओढ्यानाल्यांमध्येच नागरीवस्तीतील सांडपाणी पूर्वापार वाहून जात आहे.
|
PM Modi In Shirdi : 'सबका मालिक एक' प्रमाणेच मोदींचा 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र- अजित पवार |
कालांतराने वस्ती वाढली आणि ओढेनाल्यांत सांडपाणी मिसळण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओढ्यानाल्यांतील हे सांडपाणी थेट वाहून जात वेण्णा नदीत जाऊन मिसळते. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने परिणामी वेण्णा आणि कृष्णा नदीतील जलचक्र धोक्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार राजरोस सुरू असून, जलप्रदूषण रोखण्यासाठीच्या कोणत्याही ठोस उपाययोजना पालिका, तसेच इतर यंत्रणांकडून राबविण्यात आलेल्या नाहीत.
अलीकडेच पालिकेने संपूर्ण शहरातील गटारे बंदिस्त केली असून, ओढ्यानाल्यांचे रुंदी, अस्तरीकरण हाती घेतले आहे. या कामादरम्यान सांडपाण्यावर विकेंद्रितपणे प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. मात्र, जागा व इतर तांत्रिक कारणास्तव त्याचे काम रखडल्याने सांडपाणी थेट नदीत जाऊन मिसळण्याच्या प्रमाणात वाढच होत आहे.
या भागात होतो पाणीपुरवठा...
वेण्णा आणि कृष्णा नदीच्या संगमाखालील भागात जीवन प्राधिकरणाची उपसा विहीर आहे. याठिकाणी उपसा केलेल्या पाण्यावर कृष्णानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. येथून हे पाणी शहराच्या पूर्वभागातील सदरबझार, समर्थनगर, विलासपूर, संभाजीनगर, गोडोलीसह इतर भागांना पुरविण्यात येते.
दूरगामी परिणाम होणार...
नदीतील पाणी उपसल्यानंतर त्यावर शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रसायने व इतर घटकांचा वापर करावा लागतो. त्या रसायने, घटकांचा शीघ्ररूपी मानवी जीवनावर परिणाम होत नसला, तरी दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, तसेच नदीतील जलचक्र, पर्यावरण कायम राखण्यासाठीच्या उपाययेाजना सातारा पालिकेसह प्रदूषण महामंडळाने तातडीने राबवणे आवश्यक आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



