
Satara : वाहत्या पाण्याबरोबरच आजूबाजूचा काठ समृद्ध करणाऱ्या नद्या, वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे त्या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रांना गटारांचे स्वरूप आले असून, तेच पाणी शुद्धीकरणानंतर शहराच्या पूर्वभागास प्राधिकरणाच्या वतीने वर्षानुवर्षे पुरविण्यात येत आहे.
शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी सातारा पालिका प्रकल्प उभारत असली, तरी त्याची उभारणी संथगतीने सुरू आहे. बदल्या काळानुरूप वाढणारी, विस्तारणारी गावे, शहरे, वाढलेले औद्योगिकीकरण व उभे राहिलेल्या कारखानदारीमुळे मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या नद्यांचे जलचक्र धोक्यात येत चालले आहे.
अजिंक्यतारा, यवतेश्वर आणि पेढ्याचा भैरोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या साताऱ्यातून डोंगररांगातून आलेले नैसर्गिक ओढे आणि नाले वाहतात. या ओढ्यानाल्यांमध्येच नागरीवस्तीतील सांडपाणी पूर्वापार वाहून जात आहे.
|
PM Modi In Shirdi : 'सबका मालिक एक' प्रमाणेच मोदींचा 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र- अजित पवार |
कालांतराने वस्ती वाढली आणि ओढेनाल्यांत सांडपाणी मिसळण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओढ्यानाल्यांतील हे सांडपाणी थेट वाहून जात वेण्णा नदीत जाऊन मिसळते. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने परिणामी वेण्णा आणि कृष्णा नदीतील जलचक्र धोक्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार राजरोस सुरू असून, जलप्रदूषण रोखण्यासाठीच्या कोणत्याही ठोस उपाययोजना पालिका, तसेच इतर यंत्रणांकडून राबविण्यात आलेल्या नाहीत.
अलीकडेच पालिकेने संपूर्ण शहरातील गटारे बंदिस्त केली असून, ओढ्यानाल्यांचे रुंदी, अस्तरीकरण हाती घेतले आहे. या कामादरम्यान सांडपाण्यावर विकेंद्रितपणे प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. मात्र, जागा व इतर तांत्रिक कारणास्तव त्याचे काम रखडल्याने सांडपाणी थेट नदीत जाऊन मिसळण्याच्या प्रमाणात वाढच होत आहे.
या भागात होतो पाणीपुरवठा...
वेण्णा आणि कृष्णा नदीच्या संगमाखालील भागात जीवन प्राधिकरणाची उपसा विहीर आहे. याठिकाणी उपसा केलेल्या पाण्यावर कृष्णानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. येथून हे पाणी शहराच्या पूर्वभागातील सदरबझार, समर्थनगर, विलासपूर, संभाजीनगर, गोडोलीसह इतर भागांना पुरविण्यात येते.
दूरगामी परिणाम होणार...
नदीतील पाणी उपसल्यानंतर त्यावर शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रसायने व इतर घटकांचा वापर करावा लागतो. त्या रसायने, घटकांचा शीघ्ररूपी मानवी जीवनावर परिणाम होत नसला, तरी दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, तसेच नदीतील जलचक्र, पर्यावरण कायम राखण्यासाठीच्या उपाययेाजना सातारा पालिकेसह प्रदूषण महामंडळाने तातडीने राबवणे आवश्यक आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




