
Satara : वाहत्या पाण्याबरोबरच आजूबाजूचा काठ समृद्ध करणाऱ्या नद्या, वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे त्या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रांना गटारांचे स्वरूप आले असून, तेच पाणी शुद्धीकरणानंतर शहराच्या पूर्वभागास प्राधिकरणाच्या वतीने वर्षानुवर्षे पुरविण्यात येत आहे.
शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी सातारा पालिका प्रकल्प उभारत असली, तरी त्याची उभारणी संथगतीने सुरू आहे. बदल्या काळानुरूप वाढणारी, विस्तारणारी गावे, शहरे, वाढलेले औद्योगिकीकरण व उभे राहिलेल्या कारखानदारीमुळे मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या नद्यांचे जलचक्र धोक्यात येत चालले आहे.
अजिंक्यतारा, यवतेश्वर आणि पेढ्याचा भैरोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या साताऱ्यातून डोंगररांगातून आलेले नैसर्गिक ओढे आणि नाले वाहतात. या ओढ्यानाल्यांमध्येच नागरीवस्तीतील सांडपाणी पूर्वापार वाहून जात आहे.
|
PM Modi In Shirdi : 'सबका मालिक एक' प्रमाणेच मोदींचा 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र- अजित पवार |
कालांतराने वस्ती वाढली आणि ओढेनाल्यांत सांडपाणी मिसळण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओढ्यानाल्यांतील हे सांडपाणी थेट वाहून जात वेण्णा नदीत जाऊन मिसळते. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने परिणामी वेण्णा आणि कृष्णा नदीतील जलचक्र धोक्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार राजरोस सुरू असून, जलप्रदूषण रोखण्यासाठीच्या कोणत्याही ठोस उपाययोजना पालिका, तसेच इतर यंत्रणांकडून राबविण्यात आलेल्या नाहीत.
अलीकडेच पालिकेने संपूर्ण शहरातील गटारे बंदिस्त केली असून, ओढ्यानाल्यांचे रुंदी, अस्तरीकरण हाती घेतले आहे. या कामादरम्यान सांडपाण्यावर विकेंद्रितपणे प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. मात्र, जागा व इतर तांत्रिक कारणास्तव त्याचे काम रखडल्याने सांडपाणी थेट नदीत जाऊन मिसळण्याच्या प्रमाणात वाढच होत आहे.
या भागात होतो पाणीपुरवठा...
वेण्णा आणि कृष्णा नदीच्या संगमाखालील भागात जीवन प्राधिकरणाची उपसा विहीर आहे. याठिकाणी उपसा केलेल्या पाण्यावर कृष्णानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. येथून हे पाणी शहराच्या पूर्वभागातील सदरबझार, समर्थनगर, विलासपूर, संभाजीनगर, गोडोलीसह इतर भागांना पुरविण्यात येते.
दूरगामी परिणाम होणार...
नदीतील पाणी उपसल्यानंतर त्यावर शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रसायने व इतर घटकांचा वापर करावा लागतो. त्या रसायने, घटकांचा शीघ्ररूपी मानवी जीवनावर परिणाम होत नसला, तरी दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, तसेच नदीतील जलचक्र, पर्यावरण कायम राखण्यासाठीच्या उपाययेाजना सातारा पालिकेसह प्रदूषण महामंडळाने तातडीने राबवणे आवश्यक आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



