
काठमांडू / नवी दिल्ली:भारत-नेपाल सीमावर्ती भागात राहणारे नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. नेपालमधील पंतप्रधान बालेन शाह सरकारने सीमाशुल्क (भंसार शुल्क) धोरणात एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नेपाल सरकारने भारत सीमा ओलांडून येणाऱ्या वैयक्तिक आणि दैनंदिन उपयोगाच्या सामानावरील शुल्क सवलत थेट पाच पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० रुपयांची मर्यादा आता ५०० रुपयांवर
नेपालच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित राजपत्रित अधिसूचनेनुसार (गॅझेट), आता भारत-नेपाल सीमेवरून खरेदी करून आणल्या जाणाऱ्या खाजगी उपयोगाच्या वस्तूंवर ५०० नेपाळी रुपयांपर्यंत (अंदाजे ३१२ भारतीय रुपये) कोणतीही कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) आकारली जाणार नाही. यापूर्वी बालेन शाह सरकार सत्तेवर आल्यानंतर ही सवलत मर्यादा अवघी १०० नेपाळी रुपये करण्यात आली होती. म्हणजेच १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अगदी साध्या बिस्किटांच्या पुड्यावर किंवा मसाल्यांवरही कर भरवा लागत होता.
जुना नियम का बदलावा लागला?
नेपाल सरकारने सुरुवातीला सीमापार होणारी तस्करी रोखण्यासाठी आणि अंतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी १०० रुपयांची कडक मर्यादा लागू केली होती. मात्र, या जाचक नियमामुळे तराई आणि मधेश यांसारख्या भारत-नेपाल सीमेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. अनेक तपासनाक्यांवर नागरिक आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांमध्ये दररोज खटके उडत होते आणि हे आंदोलन थेट नेपाळच्या संसदेपर्यंत पोहोचले होते. नागरिकांचा वाढता दबाव आणि सीमावर्ती भागातील तणाव पाहता अखेर नेपाळ सरकारला आपल्या निर्णयात सुधारणा करावी लागली आहे.
नवीन नियमातील तरतुदी आणि सवलती
-
वैयक्तिक सामानाला सूट: ५०० रुपयांपर्यंतचे वैयक्तिक सामान आणणाऱ्या प्रवाशांना त्यांची खरेदी योग्य असल्याचे कारण स्पष्ट केल्यास कस्टम ड्युटीमधून पूर्ण सूट मिळेल.
-
व्यापारी मालावर कर कायम: ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे किंवा व्यावसायिक (Commercial) उद्देशाने आणलेल्या सामानावर विद्यमान कायद्यानुसार नेहमीप्रमाणे कर आकारला जाईल.
-
विद्यार्थ्यांना विशेष दिलासा: भारतात शिक्षण घेणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांना दिलेली सवलत कायम ठेवण्यात आली आहे. ते स्वतःच्या वापरासाठी टॅबलेट आणि लॅपटॉप कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नेपाळमध्ये नेऊ शकतील.
या नवीन पाचपट वाढवलेल्या सवलतीमुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील स्थानिक आर्थिक आणि सामाजिक संबंध पुन्हा मजबूत होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



