
काठमांडू / नवी दिल्ली:भारत-नेपाल सीमावर्ती भागात राहणारे नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. नेपालमधील पंतप्रधान बालेन शाह सरकारने सीमाशुल्क (भंसार शुल्क) धोरणात एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नेपाल सरकारने भारत सीमा ओलांडून येणाऱ्या वैयक्तिक आणि दैनंदिन उपयोगाच्या सामानावरील शुल्क सवलत थेट पाच पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० रुपयांची मर्यादा आता ५०० रुपयांवर
नेपालच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित राजपत्रित अधिसूचनेनुसार (गॅझेट), आता भारत-नेपाल सीमेवरून खरेदी करून आणल्या जाणाऱ्या खाजगी उपयोगाच्या वस्तूंवर ५०० नेपाळी रुपयांपर्यंत (अंदाजे ३१२ भारतीय रुपये) कोणतीही कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) आकारली जाणार नाही. यापूर्वी बालेन शाह सरकार सत्तेवर आल्यानंतर ही सवलत मर्यादा अवघी १०० नेपाळी रुपये करण्यात आली होती. म्हणजेच १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अगदी साध्या बिस्किटांच्या पुड्यावर किंवा मसाल्यांवरही कर भरवा लागत होता.
जुना नियम का बदलावा लागला?
नेपाल सरकारने सुरुवातीला सीमापार होणारी तस्करी रोखण्यासाठी आणि अंतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी १०० रुपयांची कडक मर्यादा लागू केली होती. मात्र, या जाचक नियमामुळे तराई आणि मधेश यांसारख्या भारत-नेपाल सीमेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. अनेक तपासनाक्यांवर नागरिक आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांमध्ये दररोज खटके उडत होते आणि हे आंदोलन थेट नेपाळच्या संसदेपर्यंत पोहोचले होते. नागरिकांचा वाढता दबाव आणि सीमावर्ती भागातील तणाव पाहता अखेर नेपाळ सरकारला आपल्या निर्णयात सुधारणा करावी लागली आहे.
नवीन नियमातील तरतुदी आणि सवलती
-
वैयक्तिक सामानाला सूट: ५०० रुपयांपर्यंतचे वैयक्तिक सामान आणणाऱ्या प्रवाशांना त्यांची खरेदी योग्य असल्याचे कारण स्पष्ट केल्यास कस्टम ड्युटीमधून पूर्ण सूट मिळेल.
-
व्यापारी मालावर कर कायम: ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे किंवा व्यावसायिक (Commercial) उद्देशाने आणलेल्या सामानावर विद्यमान कायद्यानुसार नेहमीप्रमाणे कर आकारला जाईल.
-
विद्यार्थ्यांना विशेष दिलासा: भारतात शिक्षण घेणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांना दिलेली सवलत कायम ठेवण्यात आली आहे. ते स्वतःच्या वापरासाठी टॅबलेट आणि लॅपटॉप कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नेपाळमध्ये नेऊ शकतील.
या नवीन पाचपट वाढवलेल्या सवलतीमुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील स्थानिक आर्थिक आणि सामाजिक संबंध पुन्हा मजबूत होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




