पुणे: कचऱ्यातून निघणारे विषारी वायू ठरत आहेत आरोग्यासाठी धोकादायक

पुणे: शहरातील विविध भागांमध्ये उघड्यावर साचणारे कचऱ्याचे ढिगारे आता केवळ स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला नसून तो सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोक्याचा विषय बनला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून बाहेर पडणारे विषारी वायू, दुर्गंधी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विशेषतः पावसाळ्यात ओल्या कचऱ्याचे विघटन वेगाने होत असल्याने मिथेनसारखे घातक वायू तयार होतात. या वायूंमुळे श्वसनाचे विकार, दमा, अॅलर्जी, डोळ्यांची जळजळ तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांभोवती डास, माशा आणि इतर कीटकांची वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट, घराघरांत ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, तसेच उघड्यावर कचरा टाकणे टाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जबाबदारीने वागल्यास अशा धोक्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *