
Pune : भारतात अमेरिकतील ॲपल कंपनीच्या आयफोन-१७ चे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक शहरांमध्ये आयफोनच्या खरेदीसाठी ॲपलच्या दालनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत तर या रांगेत मारामारी होण्याची वेळ आली. अमेरिकी उत्पादनांसाठी अशा प्रकारे लाल गालिचा अंथरला जातो, कोट्यवधी रुपयांची विक्री होते. परंतु ज्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आपल्या ज्ञानाचा आणि मेहनतीचा खरा हातभार लावला आहे, त्यांनाच एच-१ बी व्हिसाच्या ट्रम्पकालीन अन्यायी धोरणांमुळे फटका बसत आहे. यावरून फोरम फोर आयटी एम्प्लॉईजने भारत सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे.
भारताचा सर्वांत मोठी निर्यात ही मानवी बुद्धिमत्ता आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातून ही सर्वाधिक आहे. हीच मानवी बुद्धिमता अमेरिकेला अब्जावधी डॉलरचे उत्पन्न मिळवून देते. तरीही अमेरिकेत भारतीय आयटी कर्मचाऱ्यांवर बंधने, नवे शुल्क आणि अस्थिर धोरणे लादली जात आहेत. याचवेळी अमेरिकी कंपन्यांची उत्पादने भारतात निर्बंधाशिवाय, थेट प्रवेश करतात. ही विसंगती संतापजनक आहे, असे आयटी फोरमने म्हटले आहे.
नव्या नियमांनुसार एच-१ बी व्हिसावर १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ८८ लाख रुपय शुल्क लावण्याचा निर्णय म्हणजे थेट भारतीयांवर आर्थिक गंडांतर आहे. सध्या सुटीसाठी भारतात आलेले किंवा येण्याचे नियोजन करणारे कर्मचारी या निर्णयाने अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना भेटणे किंवा वैद्यकीय कारणांसाठी भारतात येणे हेही त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे आयटी फोरमने स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये अमेरिकन उत्पादनांना बाजारपेठ खुली करून देताना, भारतीय मानवी संपदेला न्याय मिळेल याची खात्री भारतीय सरकारने करून द्यायला हवी. आपली ताकद म्हणजे प्रतिभा, आणि तीच जर अन्यायकारक धोरणांनी गुदमरली, तर हा देश फक्त आयफोन विकत घेणारा बाजार राहील; जागतिक ज्ञानशक्ती म्हणून ओळखला जाणार नाही, अशी टीका तज्ज्ञांकडून होत आहे.
या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर व कामगार मंत्रालयाने अमेरिकेकडे कठोरपणे बाजू मांडावी. भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना वाचवणे ही केवळ उद्योगाची नव्हे, तर राष्ट्रीय प्राधान्यक्रमाची बाब असणे आवश्यक आहे, असेही आयटी फोरमने नमूद केले आहे.
शहर
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
महाराष्ट्र
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला




























Subscribe to my channel




