
Pune Ganeshotsav : पुण्यात पारंपरिक गणेशोत्सवाची चर्चा संबंध महाराष्ट्रात असते. एकाबाजूला डिजे, लाऊडस्पीकरचा ठणठणाट वाढत असताना पुण्यात ढोल-ताशाच्या गजरात गणेश आगमन आणि विसर्जन पार पडत असते. यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगळा प्रयोग करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पावरी नृत्य सादर केले. पण या कलेसाठी पुणेकरांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आदिवाशी नृत्य सादर करणाऱ्या पथकाचा हिरमोड झाला असल्याची प्रतिक्रिया मुकुंद पाडवी यांनी दिली आहे. मुकुंद पाडवी यांच्या नेतृत्वाखाली २२ जणांच्या चमूने पुण्यात हे नृत्य सादर केले होते.
यंदा पुण्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी बांधवाना पुण्यात बोलावले गेले आहे. आदिवासी समुदायाच्या कलेला वाव देण्यासाठी २०१७ पासून गणेशोत्सवादरम्यान त्यांची कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला जात आहे. एकूण १२० विविध जमातींना पुण्यात निमंत्रित केले गेले आहे, मुकुंद पाडवी हे त्यापैकीच एक आहेत.
|
|
मुकुंद पाडवी यांच्या पावरी नृत्यासाठी अद्याप दोनच मंडळांनी नोंदणी केली आहे. गणेश आगमनाचे पहिले दोन दिवस आणि शेवटच्या दिवसासाठी एक बुकिंग मिळाली आहे. “नृत्य सादर करणारे कलाकार आता पुन्हा आपल्या गावी पोहोचले आहेत. ते थेट शेवटच्या दिवशी परत येतील. आम्ही जवळपास ३५ मंडळाशी संपर्क साधला, पण त्यांनी बजेट नसल्याचे कारण पुढे केले. ज्या लोकांनी आदिवासी नृत्यासाठी रस दाखविला, त्यांनी आमच्याकडे डिस्काऊंटची मागणी केली. आमचे एवढेच म्हणणे आहे की, कलाकारांना जो आदर मिळायला हवा, तो दिला गेला पाहिजे. त्यांच्या कलेची किंमत करू नये”, अशी खंत मुकुंद पाडवी यांनी व्यक्त केली.
रजत रघतवन यांनी २०१७ साली युनिव्हर्सल ट्राइब्स या संस्थेची स्थापना करून भारतातील आदिवासी जमातीच्या सबलीकरणाची सुरुवात केली. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, २०१९ साली आम्हाला पुण्यात एका पथकाने कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले. यावर्षी आदर्श मित्र मंडळाचे उपाध्यक्ष उदय जगताप यांच्या साथीने रतज रघतवन हे धनकवडी येथील ११ मंडळासह काम करणार आहेत.
उदय जगताप म्हणाले की, आम्ही आदिवासी जमातींना राज्याच्या विविध भागांतून आमंत्रित करत आहोत. जेणेकरून शहरातल्या लोकांनाही त्यांच्या संस्कृतीचे दर्शन होईल. तसेच या कलाकारांनाही रोजगाराचे साधन मिळेल. सध्या गणेश मिरवणुकीत डिजेच्या दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषण होत असून लोकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आदिवासी कला सादर करण्याचा एक उत्तम पर्याय मंडळासमोर आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



