
Pimpri-Chinchwad : लेह लडाख येथे पर्यटनाचा आनंद लुटू घरी परत येताना राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची पार्थिवं विमानाने गुरुवारी १९ मार्च रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात आली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघा मित्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय झालं?
कुणाल किरण चोरडिया (रा. चिंचवड गाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) अशी मृत तरुणांची नावं आहेत. शहरातील काही तरुण तीन कारमधून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेह-लडाखला गेले होते. तेथून परत येत असताना राजस्थानात कोटाजवळ मुंबई-दिल्ली महामार्गावर एका कारला अपघात झाला. यात कारमधील तिघांनाही प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारगिल येथे सर्व तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना तिथून सुरक्षित बाहेर काढले होते. यापैकी तिघांना परतीच्या प्रवासात मृत्यूने गाठल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी स्मशानभूमी, सिद्धांत आल्हाट याच्यावर वाकड गावठाणातील स्मशानभूमी आणि मयुरेश पाडाळे याच्यावर म्हाळुंगे पाडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी या दु:खद प्रसंगाने वातावरण शोकाकुल झाले होते. तिघांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांना दु:ख अनावर झाले.
नेत्यांकडूनही श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही फेसबुकवरुन तिघा तरुणांना श्रद्धांजली वाहिली आहे. "लडाखची स्वप्नवत सहल आनंदाने सुरू झाली… पण परतीच्या प्रवासात आलेल्या त्या भीषण अपघाताने सर्व काही एका क्षणात हिरावून नेले. पिंपरी-चिंचवडमधील सिद्धांत आल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे या तिन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू ही मन सुन्न करून टाकणारी घटना आहे."
"आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे हसरे चेहरे आज कायमचे हरवले, ही वेदना शब्दांत मांडणं अशक्य आहे. हिंदू नववर्षाच्या प्रारंभी अशी दुर्दैवी घटना समोर आल्यामुळे पिंपरी-चिंचवडवर शोककळा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या असीम दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना..!" अशा भावना शेळकेंनी व्यक्त केल्या आहेत.
अपघात झालेल्या मित्रांसोबत आणखी एक तरुण होता. परंतु मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला होता. जेव्हा त्याला अपघाताची माहिती समजली, तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




