
Pimpri-Chinchwad : लेह लडाख येथे पर्यटनाचा आनंद लुटू घरी परत येताना राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची पार्थिवं विमानाने गुरुवारी १९ मार्च रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात आली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघा मित्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय झालं?
कुणाल किरण चोरडिया (रा. चिंचवड गाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) अशी मृत तरुणांची नावं आहेत. शहरातील काही तरुण तीन कारमधून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेह-लडाखला गेले होते. तेथून परत येत असताना राजस्थानात कोटाजवळ मुंबई-दिल्ली महामार्गावर एका कारला अपघात झाला. यात कारमधील तिघांनाही प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारगिल येथे सर्व तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना तिथून सुरक्षित बाहेर काढले होते. यापैकी तिघांना परतीच्या प्रवासात मृत्यूने गाठल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी स्मशानभूमी, सिद्धांत आल्हाट याच्यावर वाकड गावठाणातील स्मशानभूमी आणि मयुरेश पाडाळे याच्यावर म्हाळुंगे पाडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी या दु:खद प्रसंगाने वातावरण शोकाकुल झाले होते. तिघांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांना दु:ख अनावर झाले.
नेत्यांकडूनही श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही फेसबुकवरुन तिघा तरुणांना श्रद्धांजली वाहिली आहे. "लडाखची स्वप्नवत सहल आनंदाने सुरू झाली… पण परतीच्या प्रवासात आलेल्या त्या भीषण अपघाताने सर्व काही एका क्षणात हिरावून नेले. पिंपरी-चिंचवडमधील सिद्धांत आल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे या तिन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू ही मन सुन्न करून टाकणारी घटना आहे."
"आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे हसरे चेहरे आज कायमचे हरवले, ही वेदना शब्दांत मांडणं अशक्य आहे. हिंदू नववर्षाच्या प्रारंभी अशी दुर्दैवी घटना समोर आल्यामुळे पिंपरी-चिंचवडवर शोककळा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या असीम दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना..!" अशा भावना शेळकेंनी व्यक्त केल्या आहेत.
अपघात झालेल्या मित्रांसोबत आणखी एक तरुण होता. परंतु मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला होता. जेव्हा त्याला अपघाताची माहिती समजली, तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



