
Pune Bus Stop : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील बसथांबे आधुनिक आणि स्मार्ट होणार आहेत. दिल्लीच्या धर्तीवर या बस थांब्यांची निर्मिती केली जाणार आहे. सुरूवातीला पुण्यात १७०० ठिकाणी ही आधुनिक बस थांबे उभारले जाणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएलने दिल्लीच्या मॉडेलपासून प्रेरित होऊन आधुनिक आणि स्मार्ट बस थांबे बांधण्याचा मानस केला आहे. या माध्यमातून पुण्यातील बस थांब्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत पीएमपीएमएलने निर्णय घेतला आहे.
या स्मार्ट बस थांब्यावर फक्त जाहिरातीच नाही तर प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती देखील दिली जाणार आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये ही बस थांबे प्रवाशांना जास्त उपयोगी ठरणार आहेत. कारण या बस थांब्यामुळे ऊन आणि पावसामुळे प्रवाशांचा बचाव होणार आहे. पीएमपीचे पथक लवकरच दिल्लीतील स्मार्ट बस थांब्याची माहिती घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.
|
|
पीएमपीच्या अधिकाऱ्यांच्या मते, पीएमपीएमएलचे एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला भेट देऊन त्यांच्या स्मार्ट बस थांबा पायाभूत सुविधांचा अभ्यास आणि पाहणी करणार आहे. पीएमपीएमएल अध्यक्ष आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यात या उपक्रमाबाबत चर्चा आधीच झाली आहे. ज्यावरून सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न दिसून येत आहेत.
या स्मार्ट बस थांब्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. पीएमपीएमएलचे उद्दिष्ट विविध सुधारणांच्या माध्यमातून त्यांचे वाहतूक नेटवर्क अधिक प्रवासी-केंद्रित बनवण्याचे आहे आणि बस थांब्यांचे आधुनिकीकरण हा या धोरणाचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. नवीन थांबे स्मार्ट, आधुनिक, सुसज्ज आणि माहितीपूर्ण करण्याचा प्रयत्न पीएमपीचा आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अंदाजे १,७०० नवीन स्मार्ट बस थांबे प्रस्तावित आहेत. हे बांधा-चालवा-हस्तांतरण (BOT) मॉडेल अंतर्गत बांधले जाणार आहेत.दिल्लीच्या स्मार्ट बस थांब्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल-टाइम बस माहिती पॅनेल, सार्वजनिक सेवा संदेशासाठी समर्पित जागा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या डिझाइन आहेत. अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित वाहतूक वातावरण तयार करण्यासाठी पीएमपीएमएलचा प्रयत्न आहे. दिल्लीप्रमाणेच पुणेकरांनाही या सुविधा मिळाव्यात असा पीएमपीएचा मानस आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



