
Pune : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला. वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांच्या अभावामुळे चाकणमधील उद्योग अडचणीत आले आहेत. अखेर याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांची झाडाझडती घेऊन उद्योगांची कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले.
चाकण औद्योगिक वसाहतीत छोट्या-मोठ्या सुमारे २ हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये एकूण १५ लाखांहून अधिक कामगार काम करीत आहेत. या औद्योगिक वसाहतीत मर्सिडीज बेंझ, बजाज ऑटो, महिंद्रा, फोक्सवॅगन, स्कोडा, ब्रीजस्टोन, ह्युंदाई, फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, बॉश यासह अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचबरोबर कचऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, त्यांना सरकारी पातळीवर काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
|
NEP 2020: सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तराविना |
चाकणमध्ये कार्यरत असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांनी इथेच विस्तार करण्याऐवजी विस्तारासाठी इतर राज्यांना प्राधान्य दिले. यामुळे येथील अपुऱ्या सुविधांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चाकण येथील तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. विनापरवाना रिक्षांची संख्या आटोक्यात आणावी. परिसरातील रस्ते, महामार्गांवरील सर्व प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत. चाकण परिसरातून जाणाऱ्या चारपदरी महामार्गाच्या बाजूला असणारी मोकळी जागा एमआयडीसीने उपलब्ध करून द्यावी. त्याठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने सहापदरी रस्त्याचे काम प्राधान्याने सुरू करावे.
चाकण परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या हद्दीतील ट्रक टर्मिनलच्या नियोजित जागेवर वाहनतळ विकसित करण्याचे काम पीएमआरडीएने करावे. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी १७९ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. औद्योगिक परिसरातील कचऱ्यासह आसपासच्या १७ गावांमधील कचऱ्यावर स्थानिक परिसरात प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने ४ एकर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभे करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सरकारी यंत्रणांकडे यासाठी पाठपुरावा करीत आहोत. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधांचा उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. – दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी स्वत: परिसराची पाहणी करावी. त्यानंतर तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
चाकण औद्योगिक वसाहतीचे दुखणे
– ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी
– कोंडीमुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम
– दिवसेंदिवस वाढणारी कचऱ्याची समस्या
– कुशल मनुष्यबळाची कमतरता
– नवीन कंपन्या येण्याचे प्रमाण नगण्य
– पाणी टंचाईचे वाढते प्रमाण
– देशात सर्वाधिक वीज दर
– वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने आर्थिक नुकसान
– माथाडी कामगार संघटनांची गुंडगिरी
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




