
Pune : राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मतदारसंघाचे पुनर्रचना करण्याबरोबरच हमखास मिळणारी मते असलेला भाग मतदारसंघात नव्याने समाविष्ट करण्याचे डावपेच सत्ताधारी पक्ष कायम करत आला आहे. त्यामुळेच विकासाच्या नावाखाली पुण्यात नवीन गावे समाविष्ट करण्याचा प्रयोग अनेकदा झाला आहे. त्या सर्वातून समाविष्ट गावांचा विकास किती झाला हा भाग निराळा. मात्र, यशाची हमी देणारे आपापल्या परिसराचे मतदारसंघ सत्ताधारी पक्षांनी तयार केले. तथापि काळ बदलला, तसे मतदारही बदलले असून, काही मतदारसंघ तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हातातून निसटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणेकरांबरोबरच समाविष्ट गावांतील मतदार हे ‘निर्णायक’ ठरणार आहेत. त्यामुळे पुण्याचा निकाल आता पुणेकरांबरोबरच नव्याने समाविष्ट गावांवर अवलंबून असणार आहे.
पुण्याच्या हद्दीत ३८ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर १९९७ रोजी तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारने घेतला. त्यामध्ये बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूस, बावधन, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, हिंगणे-खुर्द, वडगाव बुद्रुक, वडगाव-धायरी, सातववाडी, विठ्ठलनगर, साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, महंमदवाडी, शिवणे, कोंढवे, उत्तमनगर आदी गावांचा समावेश होता. या गावांचा विकास वेगाने करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, शाळांच्या इमारती यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली. या समाविष्ट गावांचा समावेश प्रामुख्याने खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांमध्ये करण्यात आला. हा परिसर सुरुवातीला काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर होता. मात्र, हा सर्व परिसर नव्याने विकसित होत असल्याने भाजप-शिवसेना युतीसाठी मदतीचा हात देणारा ठरत गेला.
|
Mumbai : विमानात बॉम्बच्या धमकीप्रकरणी आतापर्यंत १२ गुन्हे दाखल |
सत्ताधारी आपल्या सोयीनुसार मते मिळविण्यासाठी गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा खेळ खेळत आले आहेत. विकासाच्या नावाखाली गावे महापालिकेत समाविष्ट करायची, जमिनीचे भाव वधारले, की आपल्या पक्षाचे स्थानिक नेते आणि बांधकाम व्यावसायिकांना मदत होण्यासाठी त्यांपैकी काही गावे वगळायची. त्यानंतर दिसेल तिथे इमारती बांधायच्या. मोकळ्या जागा संपल्या, की गावे पुन्हा महापालिकेकडे देऊन मोकळे व्हायचे. तोपर्यंत गावांचे रूप पालटून तेथे सिमेंटची जंगले उभी राहिलेली असतात. पुण्यात नव्याने समाविष्ट गावांमध्ये हेच चित्र पाहायला मिळते. यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या गावांपैकी १५ गावे पूर्ण आणि ५ गावे अंशत: वगळण्याचा निर्णय १७ नोव्हेंबर २००१ रोजी घेण्यात आला. मात्र, हे मतदार खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये कायम राहिले.
महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांची साथ लाभण्यासाठी गावे समाविष्ट करण्याचा दुसरा प्रयोग २०१७ मध्ये झाला. तत्कालीन राज्य सरकारने ४ ऑक्टोबर २०१७ रोजी नियोजित ३४ पैकी ११ गावांचा समावेश महापालिकेत केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उर्वरित २३ गावांचा तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रतीक्षेत असलेली ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय २०२१ मध्ये पुढील महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आला. त्यामुळे राज्यात भौगोलिकदृष्ट्या पुणे ही मुंबईपेक्षाही मोठी महापालिका ठरली. तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले, तरी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहामुळे म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, वाघोली ही गावे महापालिकेत घेण्यात आली. यातील काही परिसर हा खडकवासला, हडपसर या विधानसभा मतदारसंघांबरोबरच वडगाव शेरी मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला. विशेषत: वडगाव शेरी आणि हडपसर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सकारात्मक झाले.
समाविष्ट गावांपैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हट्टामुळे घेण्यात आला. या दोन गावांची मिळून नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. खरे तर हा भाग राष्ट्रवादी काँग्रेससाठीच फायदेशीर होता. मात्र, हा भाग वगळला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हक्काचे मतदार कमी झाले आहेत.
पुण्याच्या हद्दीत नवीन गावे समाविष्ट करताना हक्काचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निर्णय घेतलेले दिसतात. मात्र, ही गावे विकसित होत असताना पुण्याबाहेरील अनेक मतदार या गावांमध्ये स्थायिक झाले आहेत. सध्या तर काही समाविष्ट गावांमध्ये मूळ रहिवाशांपेक्षा पुण्याबाहेरील मतदारांची संख्या जास्त झाली आहे. हक्काचे मतदार पाहून गावे समाविष्ट करण्यात आली असली, तरी आता नवीन मतदारांचा अंदाज राजकीय पक्षांना येत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समाविष्ट गावांतील मतदार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू झाली आहे.
शहर
- महाराष्ट्र: जुन्या वाहनांना हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ ची डेडलाईन
- नवी मुंबईत एसीबीचा मोठा दणका; अप्पर जिल्हाधिकारी २२ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद
- मुंबई: नात्यातील विश्वासघात! मृत मावशीच्या बँक खात्यातून भाचीने लांबवले १.७ कोटी रुपये
- महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानातील गँगच्या संपर्कात असलेल्या ७ तरुणांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र
- रायगडमध्ये भीषण दुर्घटना! हायवा ट्रकमुळे पूल कोसळला; ४ ते ५ गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थ संतप्त
- प्रशासनाचा पाषाणहृदयी चेहरा: लसीकरणानंतर चिमुरडीचा अंत, मृतदेह शवगृहात ठेवण्यास नकार दिल्याने आजोबांची रात्र नातीच्या मृतदेहासह मांडीवर.
- काळीज पिळवटून टाकणारी घटना: बुलढाण्यात लेकीच्या कन्यादानावेळीच पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत.
- नंदुरबार: अगरवाल कुटुंबाची झेप! मिरची प्रक्रिया उद्योगातून वार्षिक ८० लाखांची कमाई
गुन्हा
- प्रेमात विश्वासघात! अल्पवयीन प्रेयसीचा खाजगी व्हिडिओ बनवून केला व्हायरल; शिरोळमधील नराधमाला बेड्या
- नवी मुंबईत एसीबीचा मोठा दणका; अप्पर जिल्हाधिकारी २२ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद
- शेगाव हादरलं! महिला कर्मचाऱ्यांचे गुप्त व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; हॉटेल मालक अटकेत
- बीड: ६५ वर्षीय वृद्धाचे संतापजनक कृत्य; अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!



























Subscribe to my channel




