
Pune : राज्यभरात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे. मागील २४ तासांत सांताक्रुजमध्ये ७५.१, डहाणूत ५७.७, सोलापुरात ८२ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी (२३ सप्टेंबर) रात्रीपासून पावसाचा जोर आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे पावसाने झोडपून काढले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत डहाणूत ५७.७, हर्णेत ३२.२, कुलाब्यात १५.८, सांताक्रुजमध्ये ७५.१ आणि रत्नागिरीत २४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने संपूर्ण किनारपट्टीवर पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
पुणे शहर आणि उपनगरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे काही क्षणांत पाणी पाणी होत आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरात झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. कोल्हापूरसह जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस होत आहे. जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले, ओढे, बंधारे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. गगनबावडा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. मागील २४ तासांत १९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सोलापूर शहरात २४ तासांत ८२ मिमी पाऊस झाला. शहरात दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अक्कलकोट रस्त्यावर पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला.
|
Mumbai : विद्यापीठ अधिसभा निवडणूक आजच; प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचाही नकार |
मराठवाड्यात सर्वत्र पावसाळी वातावरण झाले आहे. आकाशात ढगांची दाटी झाली आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहेत. परभणी, लातूरमध्येही पावसाचा जोर आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तासभर पाऊस पडत होता. आकाश ढगांनी काळवंडलेले आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पुणे, रायगडला आज मुसळधार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी पुणे आणि रायगडला लाल इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या शेजारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) रायगड, पुण्याला लाल इशारा, तर नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना नारंगी इशारा आणि उर्वरित महाराष्ट्राला पिवळा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारसाठी इशारा
लाल इशारा – रायगड, पुणे
नारंगी इशारा – नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पिवळा इशारा – उर्वरित महाराष्ट्र
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




