
Operation Sindoor : कंगाल पाकिस्तानला हादरा देणारं भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या मोहिमेची पूर्ण माहिती उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. भारताच्या एअर स्ट्राइकनं बिथरलेल्या पाकिस्ताननं हल्ला केला, तर भारत सरकार आणि लष्कर मागे हटणार नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.
केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत मोठं वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. भारताच्या हवाई हल्ल्यात किमान १०० दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली. सर्वपक्षीय बैठकीनंतर रिजिजू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
|
Pakistan Blast : साखळी स्फोटाने पाकिस्तान हादरला; लाहोर, कराचीसह ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले |
भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांचे आणखी १२ कॅम्प आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
रिजिजू यांनी सांगितले की, राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. हा मुद्दा गंभीर होता. सर्वांचा पाठिंबा मिळाला. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. सरकारच्या मनात नेमकं आता काय चाललंय, याबाबतची माहिती विरोधी पक्षांच्या नेत्यांना देण्यात आली. विरोधकांनीही पाठिंबा दिला असून, या मुद्द्यावर राजकारणाला थारा नाही, असे सूचित केले. हे ऑपरेशन अद्याप सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
भारतानं ऑपरेशन सिंदूर फत्ते केलं. भारतीय लष्कर, हवाई दल, नौदलानं अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ नेस्तनाबूत केले. या हवाई हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. आता पाकिस्तानच्या आणखी १२ दहशतवादी तळांची यादी तयार केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओकेपासून ते पाकिस्तानमधील दहशतवादाचं मूळच नष्ट करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तान बिथरला आहे. अख्ख्या पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. ज्या दहशतवादाला पोसलं, तोच दहशतवाद पाकिस्तानच्या मुळावर उठल्याचं आजच्या घटनेनंही समोर आलं आहे. लाहोरमध्ये सकाळी सकाळी झालेल्या साखळी स्फोटांनी पाकिस्तानचा बुरखा आणखी फाटला आहे. भारतानं फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. नऊ दहशतवादी तळांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. आता पाकिस्तानमधील आणखी १२ दहशतवादी तळ निशाण्यावर असून, कोणत्याही क्षणी त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात, असेच संकेत मिळत आहेत.
शहर
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
महाराष्ट्र
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला




























Subscribe to my channel




