नागपूर: मान्सूनवर 'एल-निनो'चे संकट अधिक गडद होत चालले आहे. ऑगस्ट महिन्याच्या उरलेल्या पाच दिवसांतही मान्सून कमकुवतच राहणार असून जोदस्त पावसाची कोणतीही शक्यता नाही, असा हवामान वेधशाळेचा अंदाज आल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे या कोरड्या व दमट वातावरणात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींवरच समाधान मानावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अगस्त महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असला, तरी आतापर्यंत विदर्भासह नागपूरमध्ये हवासा व समाधानकारक पाऊस झालेला नाही. नागपूरसह संपूर्ण विदर्भात २५ पैकी मोजक्याच दिवशी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस बरसला आहे. यामध्ये केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दिलासादायक पावसाने हजेरी लावली असून, इतर जिल्ह्यांमधील बळीराजाला आणि नागरिकांना अद्यापही जोरदार पावसाची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार बरसून पावसाची तूट काही प्रमाणात भरून काढली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे निराशा केली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांची आतापर्यंतची पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये):
-
गोंदिया: ८४३.९ मिमी
-
गडचिरोली: ८०४.० मिमी
-
भंडारा: ६०९.७ मिमी
-
यवतमाळ: ५४२.३ मिमी
-
चंद्रपूर: ५०२.० मिमी
-
वर्धा: ४४६.४ मिमी
-
वाशिम: ४३२.४ मिमी
-
बुलडाणा: ४३०.८ मिमी
-
नागपूर: ४१९.१ मिमी
-
अमरावती: ३९६.६ मिमी
-
अकोला: ३६६.४ मिमी
सोमवारी अमरावतीत काही काळ मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. दुसरीकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मंगळवारपर्यंत पावसाची चांगली उपस्थिती पाहायला मिळाली. भंडाऱ्यात मंगळवार सकाळपर्यंत २० मिमी, तर गोंदियात सकाळी २५ आणि सायंकाळपर्यंत १२ मिमी पावसाची नोंद झाली. अमरावतीतही सकाळच्या सुमारास १४.८ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी दिवसभर आकाशात ढग शांत राहिले. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उपस्थिती अत्यंत नगण्य राहिली आहे.
नागपूर जिल्ह्याची तुट ३५ टक्क्यांवर, सप्टेंबर महिन्याची स्थितीही निराशाजनक?
जुलैच्या शेवटी पावसाचे प्रमाण सरासरीच्या जवळ आले होते, मात्र ऑगस्ट महिन्यातील कोरड्या वातावरणामुळे नागपूर जिल्ह्याची पावसाची तूट थेट ३५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. तसेच संपूर्ण विदर्भातील पावसाचा बॅकलॉग (तूट) ३० टक्क्यांच्या वर गेला आहे. हवामान वेधशाळेचे अधिकारी जरी उघडपणे बोलत नसले, तरी आगामी सप्टेंबर महिन्यातही पावसाची स्थिती निराशाजनकच राहण्याची शक्यता बळावली आहे. येत्या काळात एल-निनो प्रणाली अधिक मजबूत होणार असून, देशात पाऊस आणणारी 'आयओडी' (IOD) प्रणाली देखील कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



