
Mumbai - Goa Highway : महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र कायम सुरु असून या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एक ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना रायगड जिल्ह्यातील टेमपाळे गावाच्या हद्दीत, लोणेरे आणि महाड दरम्यान घडली. रविवारी दुपारी हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ वाहतुकीचा ताण निर्माण झाला.
मृत महिलेचे नाव डॉ. प्रियांका आहिर असे असून त्या व्यवसायाने डॉक्टर होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर मुंबईच्या दिशेने वेगाने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार कंटेनरच्या मागील चाकाखाली जाऊन आडकली आणि वाहनाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. कारमधील डॉ. प्रियांका आहिर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
|
|
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात कारच्या वेगामुळे आणि कंटेनरच्या मागील बाजूस योग्य अंतर न ठेवल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरू केला आहे. कंटेनरचालकाचीही चौकशी सुरू असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणे, बेदरकार वाहनचालक आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांचा चुकीचा वापर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः लोणेरे, महाड आणि आसपासच्या भागात वारंवार घडणारे अपघात स्थानिक आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. प्रियांका आहिर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



