
Mumbai-Goa Highway : होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशी अर्ध्यातच अडकून पडले आहेत . महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. महामार्गावर छोट्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावी कधी पोहचायचं असा प्रश्न सणासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पडला आहे.
सलग दोन तीन दिवसांची सुट्टी आणि होळीचा सण असल्याने शिमगोत्सव साजर करण्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच होळीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हाल होत आहेत. महामार्ग पोलीस ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत असताना दिसत आहेत.
|
|
१२ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं सुरू आहे काम
४४० किमाी मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास १२ वर्षांपासून सुरू असून खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. त्यातही ११२ किमीच्या रस्त्याचं काम २३ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली होती, मात्र मार्च संपत आला तरी काम पूर्ण झालेलं नाही. काम पूर्ण होण्यासाठी मे उजाडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या महामार्गावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत 7,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात बोगदे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, काँक्रिटीकरण केलेल्या चौपदरीकरणाव्यतिरिक्त सेवा मार्गांचाही समावेश आहे. ४४० किमीच्या महामार्गाला मंजूरी मिळाली त्यावेळी या सुमारे 3,500 ते 4,000 कोटीच्या निधीतून काम पूर्ण करण्यात येणार होतं. मात्र आता खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. तरीही मुदतीत काम पूर्ण होत नाही. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. कोकणातील चाकरमान्यांची संख्या मुंबईत मोठी आहे. कोकणात जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला आणि सुट्ट्यांच्या काळात वाहतूक कोंडी ठरलेली असते.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

