
Mumbai : गेल्या आठवड्यातील जोरदार पावसामुळे मुंबईतील सखलभाग जलमय झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल झाले.
पूर्व उपनागरतील मानखुर्द परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये सध्या मेट्रो कारशेडचे काम सुरू आहे. मुंबईत बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पावसाचे पाणी साचले होते. परिणामी, या परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र नगराला जोडणाऱ्या भुयारी मार्गात चार ते पाच फूट खड्डे पडले असून या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवात हे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसानंतर हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. अशीच परिस्थिती चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरात आहे. येथील रस्ते अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत होते. पालिकेने खडी आणि माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र मुसळधार पावसानंतर रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. चेंबूरच्या कॅम्प, सिंधी सोसायटी, लालडोंगर परिसरातही अशीच स्थिती आहे.
|
|
चेंबूर शिवडी मार्गावरही मुख्य रस्त्यालगतच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर जंक्शनपासून काही अंतरावरील रस्त्याच्या मधोमध खड्ड्यांमुळे चाळण झाली असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रियदर्शनी परिसरातील जोड रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची भीती आहे.
चुनाभट्टी परीसरातील अशोक नगर ते चुनाभट्टी फाटक चौखाबा रोडवरही खड्डे पडले आहेत. बेस्टच्या कुर्ला आगाराबाहेरील रस्त्यांवरील खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजविण्यात आले होते. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेरील रस्त्याची तर पूर्णपणे चाळण झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दूरवस्थेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. घाटकोपरमधील गारोडिया नगर, पंतनगर सर्कल, मुलुंडच्या नवघर परिसरातील रस्ता क्रमांक १ आणि २, गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी आणि रफिक नगर परिसरातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



