मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत, आज (३० मे २०२६) सकाळी १० वाजल्यापासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सरकारसोबतची चर्चा निष्फळ:उपोषण सुरू करण्यापूर्वी २९ मे रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दीड तास चाललेल्या या चर्चेत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग निवडला.
"सरकार येईल आणि जाईल, पण मी उपोषणावर ठाम आहे," असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख १० मागण्या:
१. कुणबी प्रमाणपत्र: मराठवाड्यातील सर्व पात्र मराठा बांधवांना २९ मेपूर्वीच्या नोंदींनुसार तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
२. ऐतिहासिक जीआर: सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांच्या ऐतिहासिक संदर्भांनुसार १९९४ च्या धर्तीवर नवीन शासन निर्णय (GR) काढावा.
३. गुन्हे मागे घेणे: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान राज्यभरात दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
४. नोकरीचा जीआर: आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याबाबतचा जीआर काढावा.
५. सारथी योजना: 'सारथी' संस्थेच्या सर्व योजना पुन्हा जोमाने सुरू करण्यात याव्यात.
६. परतावा: मराठा महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करावेत.
७. जात वैधता प्रमाणपत्र: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना विनाविलंब जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) देण्याची व्यवस्था करावी.
८. उपसमिती बरखास्त: सध्याची 'मराठा आरक्षण उपसमिती' कोणतीही ठोस कामगिरी करत नसल्याने ती बरखास्त करावी.
९. स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र 'मराठा व कुणबी मंत्रालय' स्थापन करावे.
१०. शिंदे समिती: शिंदे समितीला मुदतवाढ देऊन निजामकालीन व ऐतिहासिक नोंदींची तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी.
जरांगे पाटील हे आंदोलन आतापर्यंतचे सर्वात तीव्र आंदोलन असेल आणि आरक्षणाशिवाय ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
शहर
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




