मुंबई / नागपूर:देशात 4G आणि 5G इंटरनेट सेवा आल्यापासून सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत. मात्र, या वाढत्या डिजिटलायझेशनसोबतच सायबर फसवणुकीचे प्रकारही वेगाने वाढले आहेत. सायबर भामट्यांकडून लोकांची फसवणूक करून बँक खात्यातून पैसे उडवले जातात. अशा परिस्थितीत सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 'भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने' (I4C) दोन अत्याधुनिक डिजिटल पोर्टल्स सुरू केले आहेत. यामुळे आता फसवणूक झालेली रक्कम थेट तक्रारदाराच्या बँक खात्यात परत मिळणे सुलभ होणार आहे.
काय आहेत ही नवीन पोर्टल्स?
पूर्वी सायबर फसवणुकीची रक्कम पोलिसांनी भामट्यांच्या खात्यात गोठवून (फ्रीज करून) देखील ती परत मिळवण्यासाठी नागरिकांना न्यायालय आणि बँकांच्या फेऱ्या माराव्या लागायच्या. अनेकदा न्यायालयीन आदेश आणूनही बँकांच्या किचकट प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे पैसे परत मिळत नव्हते. हीच अडचण दूर करण्यासाठी शासनाने दोन नवीन पोर्टल्स सुरू केली आहेत:
-
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम (GRM): काही वेळा सायबर तपासादरम्यान संशयित व्यवहारांमुळे काही निर्दोष नागरिकांची खातीही गोठवली जातात. अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी खातेदार, बँक आणि पोलीस यांच्यात थेट संवाद घडवून आणण्याचे काम हे पोर्टल करेल.
-
मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM): हे पोर्टल सायबर फसवणुकीतील जप्त किंवा गोठवलेली रक्कम थेट तक्रारदाराच्या बँक खात्यात डिजिटल पद्धतीने परत करण्यासाठी विकसित केले गेले आहे.
'गोल्डन अवर' (Golden Hour) का महत्त्वाचा आहे?
सायबर तज्ज्ञ आणि पोलिसांच्या मते, सायबर फसवणुकीमध्ये सुरुवातीचा १ तास म्हणजेच 'गोल्डन अवर' अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भामटे पैसे खात्यात जमा होताच ते दुसऱ्या खात्यात वळवतात किंवा वेगवेगळ्या शॉपिंग संकेतस्थळांवरून खरेदी करून डिजिटल पुरावे नष्ट करतात. जर तुम्ही फसवणूक झाल्यापासून पहिल्या १ तासाच्या आत (गोल्डन अवर) तक्रार नोंदवली, तर पोलीस यंत्रणा आणि बँका तात्काळ समन्वय साधून ते पैसे भामट्याच्या खात्यातच लॉक किंवा फ्रीज करू शकतात.
फसवणूक झाल्यास काय करावे?
-
तात्काळ कॉल करा: सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवा.
-
ऑनलाइन तक्रार: केंद्र सरकारच्या www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तात्काळ व्यवहाराच्या तपशिलासह ऑनलाइन अर्ज करा.
-
बँकेला कळवा: ज्या बँक खात्यातून पैसे वळवले गेले आहेत, त्या बँकेशी संपर्क साधून तुमचे कार्ड, UPI आयडी किंवा नेट बँकिंग ब्लॉक करा. आरबीआय (RBI) च्या नियमांनुसार, जर अनधिकृत व्यवहाराची माहिती तुम्ही ३ दिवसांच्या आत बँकेला दिली, तर तुमचे आर्थिक नुकसान टाळण्याची जबाबदारी बँकेची असते.
सायबर गुन्हे विभागाकडून या दोन्ही नवीन पोर्टल्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक पोलीस आणि सायबर पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता 'गोल्डन अवर'चा फायदा घेत तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



