जळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद वळणरस्त्यावरील (बायपास) असोदाजवळील उड्डाणपुलाचा भाग खचल्याप्रकरणी आणि त्यानंतर झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत एकूण सात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या गंभीर प्रकारानंतर अखेरीस नागरिकांसह पोलीस दलाचा संयम सुटल्याने, पोलिसांनी स्वतःहून गंभीर पाऊल उचलत संबंधित निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुलाच्या बांधकामादरम्यान आणि दुरुस्तीच्या कामातही केवळ खर्च वाचविण्याच्या उद्देशाने लोकांच्या जीवासोबत खेळण्यात आल्याचा गंभीर ठपका या गुन्ह्यामध्ये ठेवण्यात आला आहे.
निकृष्ट बांधकाम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष: राष्ट्रीय महामार्गावर पाळधी ते तरसोद या बायपास मार्गाचे बांधकाम 'ॲग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीकडून ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. मात्र, या पुलाचा आणि रस्त्याचा दर्जा अत्यंत सुमार व निकृष्ट असल्यामुळे पहिल्याच पावसात ओव्हरब्रिजचा एक भाग खचला होता. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आणि महिनाभरापासून हा बायपास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, बायपास बंद राहिल्यामुळे सर्व अवजड आणि हलकी वाहतूक जळगाव शहरातून वळवावी लागली, ज्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले. वाढलेल्या ताणामुळे हा बायपास नंतर एकेरी वाहतुकीसाठी खुला करावा लागला.
अपघातांची मालिका आणि एकाचा मृत्यू: महिनाभराच्या या कालावधीत जळगाव शहरात आणि बायपास परिसरात विविध अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच (३१ ऑगस्ट रोजी) पहाटेच्या सुमारास रावेर येथील एका रुग्णाला घेऊन नाशिकच्या दिशेने निघालेल्या तवेरा कारला सेवा रस्त्यावर एका सुसाट ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी व तरुण गंभीर जखमी झाले. या सत्रातील मृत्यूंमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती.
कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल: या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार अजय लक्ष्मण भोंबे यांच्या फिर्यादीवरून 'ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) शैलेश सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकारी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २९०, ३(५), मोटारवाहन कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुरक्षिततेच्या नियमांना हरताळ: नियमानुसार कंत्राटदार कंपनीला ३ वर्षे रस्ता व पुलाची देखभाल-दुरुस्ती करण्याची अट बंधनकारक होती. मात्र, कंपनीने खर्च वाचवण्याच्या लालसेपोटी सुरक्षेच्या सर्व उपायांकडे साफ दुर्लक्ष केले. दुरुस्तीचे काम सुरू असताना मार्गावर कोणतेही दिशादर्शक फलक, 'काम सुरू आहे' अशा सूचना देणारे बोर्ड, सुरक्षित बॅरिकेडिंग, रात्रीच्या वेळी चमकणारे ब्लिंकर्स किंवा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले नव्हते. या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच वाहनचालकांना नाहक प्राण गमवावे लागले असून पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




