पुणे: राजगड तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; केळद खिंडीत रस्ता खचला, १४ गावांचा संपर्क तुटला

पुणे: मुसळधार पावसाचा मोठा फटका राजगड तालुक्याला बसला आहे. सततच्या पावसामुळे केळद खिंडीतील मुख्य रस्ता खचल्याने तब्बल १४ गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ता खचल्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अन्नधान्य, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाचा जोर कमी झाल्यानंतर युद्धपातळीवर हाती घेतले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तोपर्यंत नागरिकांनी धोकादायक मार्गांचा वापर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे घाटमाथा आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *