
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह आणि व्होट जिहाद हे मुद्दे चालले त्यामुळे आम्ही अनेक जागांवर निवडून आलो नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत नाना पटोले म्हणाले की भाजपा आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे हिंदू मतांचा जिहाद करतात. संजय राऊत यांनीही ही टीका याबाबत केली आहे. हिंदू व्होट जिहाद बाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही असं म्हटलं आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला मुख्यमंत्री कोण असणार हे विरोधक कसं काय विचारतात? आमच्याकडे तर चेहरा आहे. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा पुढच्या पंधरा मिनिटांत आम्ही आमच्याकडून कोण चेहरा आहे ते सांगू असं खोचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? ते दोन पक्षांचे अध्यक्ष आणि आमचं संसदीय मंडळ हे मिळून चेहरा ठरवतील. सगळे त्या नावाला पाठिंबा देतील. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
|
|
आम्ही कुठलाही फॉर्म्युला ठरवलेला नाही
आम्ही कुठलाही फॉर्म्युला सध्या ठेवलेला नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. स्ट्राईक रेट किंवा इतर काही थिअरी चालत आहेत त्याला काहीही अर्थ नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा हा असा पक्ष असा आहे ज्यात व्यक्ती किंवा नेता निर्णय घेत नाही. आमचं मंडळ निर्णय घेतं. माझ्या पक्षाने मला दिल्लीत जायला सांगितलं दिल्लीत जाईन, महाराष्ट्रात थांबायला सांगितलं तर महाराष्ट्रात थांबेन, घरी जायला सांगितलं तर घरी जाईन. देवेंद्र फडणवीस आपल्या मनाने काम करत नाही पक्षाचं काम करतो. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो तरीही मी उपमुख्यमंत्री झालो. आमच्यासाठी आमचं अस्तित्व नाही. आमच्यासाठी आमचं अस्तित्व म्हणजे आमचा पक्ष भाजपा आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे विधान केलं आहे.
हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही.
हिंदू शब्दासह जिहाद हा शब्द जोडलाच जात नाही. कारण हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही. हिंदुत्वाचा अर्थ सहिष्णुता आहे. हिंदु तत्व आपल्या देशात आहे, ते सहिष्णु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षित आहेत. तुम्ही मुस्लिम बांधवांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की पाकिस्तानापेक्षा जास्त आम्हाला भारतात सुरक्षित वाटतं. तसंच आम्ही प्रगती करत आहोत आमच्यासह कुठलाही भेदभाव केला जात नाही. मला हे वाटतं की या ठिकाणी जो व्होट जिहाद झाला तसा हिंदूंनी करायचं ठरवलं असतं तर या देशाचा चेहराच बदलला असता. हिंदू कायम सहिष्णू असतात. त्यामुळेच आपला देश सेक्युलर आहे. हिंदुत्वामुळे सेक्युलारिझम आणि लोकशाही देशात जिवंत आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




