
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह आणि व्होट जिहाद हे मुद्दे चालले त्यामुळे आम्ही अनेक जागांवर निवडून आलो नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत नाना पटोले म्हणाले की भाजपा आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे हिंदू मतांचा जिहाद करतात. संजय राऊत यांनीही ही टीका याबाबत केली आहे. हिंदू व्होट जिहाद बाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही असं म्हटलं आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला मुख्यमंत्री कोण असणार हे विरोधक कसं काय विचारतात? आमच्याकडे तर चेहरा आहे. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा पुढच्या पंधरा मिनिटांत आम्ही आमच्याकडून कोण चेहरा आहे ते सांगू असं खोचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? ते दोन पक्षांचे अध्यक्ष आणि आमचं संसदीय मंडळ हे मिळून चेहरा ठरवतील. सगळे त्या नावाला पाठिंबा देतील. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
|
|
आम्ही कुठलाही फॉर्म्युला ठरवलेला नाही
आम्ही कुठलाही फॉर्म्युला सध्या ठेवलेला नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. स्ट्राईक रेट किंवा इतर काही थिअरी चालत आहेत त्याला काहीही अर्थ नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा हा असा पक्ष असा आहे ज्यात व्यक्ती किंवा नेता निर्णय घेत नाही. आमचं मंडळ निर्णय घेतं. माझ्या पक्षाने मला दिल्लीत जायला सांगितलं दिल्लीत जाईन, महाराष्ट्रात थांबायला सांगितलं तर महाराष्ट्रात थांबेन, घरी जायला सांगितलं तर घरी जाईन. देवेंद्र फडणवीस आपल्या मनाने काम करत नाही पक्षाचं काम करतो. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो तरीही मी उपमुख्यमंत्री झालो. आमच्यासाठी आमचं अस्तित्व नाही. आमच्यासाठी आमचं अस्तित्व म्हणजे आमचा पक्ष भाजपा आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे विधान केलं आहे.
हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही.
हिंदू शब्दासह जिहाद हा शब्द जोडलाच जात नाही. कारण हिंदुत्वात जिहाद हा शब्दच नाही. हिंदुत्वाचा अर्थ सहिष्णुता आहे. हिंदु तत्व आपल्या देशात आहे, ते सहिष्णु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षित आहेत. तुम्ही मुस्लिम बांधवांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की पाकिस्तानापेक्षा जास्त आम्हाला भारतात सुरक्षित वाटतं. तसंच आम्ही प्रगती करत आहोत आमच्यासह कुठलाही भेदभाव केला जात नाही. मला हे वाटतं की या ठिकाणी जो व्होट जिहाद झाला तसा हिंदूंनी करायचं ठरवलं असतं तर या देशाचा चेहराच बदलला असता. हिंदू कायम सहिष्णू असतात. त्यामुळेच आपला देश सेक्युलर आहे. हिंदुत्वामुळे सेक्युलारिझम आणि लोकशाही देशात जिवंत आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



