
Congress : राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला सलग दिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे आपच्या पराभवापेक्षा काँग्रेसच्या भोपळ्याची सर्वात जास्त चर्चा राजधानीमध्ये होत आहे. सत्ताधारी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली.
२७ वर्षांनतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेय. तर १० वर्षानंतर केजरीवाल यांच्या आपच्या झाडूचा सुपडा साफ झालाय. २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त जिंकले, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा दिल्ली काबिज करता आली नाही. इतकेच काय तर साधा एक आमदारही निवडून आला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये गणित नेमकं कुठं चुकतेय? त्याचं काँग्रेसकडून सिंहावलोकन व्हायलाच हवं.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं स्वतंत्र विभानसभा निवडणूक लढवली होती. तिहेरी लढतीचा फायदा भाजपला झाला असल्याचं बोललं जात आहे. आप पक्षातील नेत्यांनाही काही जागांवर जबरदस्त फटका बसला आहे. मुख्य म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही नवी दिल्लीत ३,१८२ मतांनी पराभव झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकींचा आजवरचा इतिहास पाहता २०१३ सालापासून काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०१३ साली काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत ८ जागांवर काँग्रेसनं आपला गढ राखला होता. २०२० सालीही ६७ जागांवर निवडणूक लढवूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यंदाच्या २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र, यंदाही काँग्रेसला भोपळा मिळण्याची शक्यता आहे.
|
Beed News : बीडमध्ये भररस्त्यावर हल्ला, डोळ्यात मिरची पावडर आणि कात्रीनं सपासप वार |
काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या?
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कंबर कसली होती. दिल्लीकरांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने अनेक आश्वासनं दिली होती. प्यारी दीदी योजना, जीवन रक्षा योजना, महागाई मुक्ती योजना, मोफत वीज योजना आणि बेरोजगार तरूणांना दरमहा ८,५०० रूपये देणार असल्याचं आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचा आणि प्रचाराचा काँग्रेसला काडीमात्र फायदा झालं नसल्याचं चित्र स्पष्ट आहे.
दिल्लीकरांचा विश्वास काँग्रेसवरून का उडाला?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी २०११ साली लोकपाल बिलसाठी उपोषण केलं होतं. त्यावेळी अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला सहभागी झाले होते. केजरीवाल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री यांच्यावर अनेक आरोप केले होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेत आपली जागा तयार केली.
भाजपनं दिल्लीत झेंडा रोवला
२७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. १९९८ साली भाजपची सत्ता होती. सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची दिल्लीवर पकड होती. २०१५ साली दिल्लीला नवा चेहरा मिळाला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी जवळपास १० वर्ष मुख्यमंत्री म्हणून भूषवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत ४८ जागा जिंकल्या.
शहर
- नागपूर पोलिसांचा 'ऑपरेशन थंडर'चा दणका! ५ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, ७० जणांना अटक; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले!
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
महाराष्ट्र
- राम मंदिर ट्रस्टला मोठा धक्का! दान घोटाळ्याच्या वादात महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा; नैतिकतेच्या आधारावर सोडली पदे!
- नागपूर पोलिसांचा 'ऑपरेशन थंडर'चा दणका! ५ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, ७० जणांना अटक; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले!
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!


























Subscribe to my channel




