
CM Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंबाबत काही दिवसांपूर्वी मोठी चर्चा रंगली होती, त्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यातच काही दिवसांपूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला होता, या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीच्या या ठरावाबाबत मोठी चर्चा रंगली होती.
यानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी’, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी तिरुपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान समितीला काही महत्वाच्या सूचना केल्या. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, “इतर धर्माचे लोक जर अजूनही मंदिरात काम करत असतील तर त्यांना आदरपूर्वक इतर ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे. तिरुमला मंदिरात फक्त हिंदूंना कामावर ठेवायला पाहिजे. जर दुसऱ्या धर्माचे लोक सध्या तिथे काम करत असतील तर त्यांच्या भावना न दुखावता त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली पाहिजे”, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
|
|
दरम्यान, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या एका निर्णयालाही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्थगिती दिल्याचं सांगितलं. एमआरकेआर आणि मुमताज बिल्डर्सच्या हॉटेल डेव्हलपर्सना तिरुपतीमधील ३५ एकर जमीन देण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केला. हा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात झाला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला निर्णय चर्चेत
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने १८ हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय चर्चेत आला होता. काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडूंनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं होतं.
शहर
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




