
CM Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंबाबत काही दिवसांपूर्वी मोठी चर्चा रंगली होती, त्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यातच काही दिवसांपूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला होता, या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीच्या या ठरावाबाबत मोठी चर्चा रंगली होती.
यानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी’, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी तिरुपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान समितीला काही महत्वाच्या सूचना केल्या. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, “इतर धर्माचे लोक जर अजूनही मंदिरात काम करत असतील तर त्यांना आदरपूर्वक इतर ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे. तिरुमला मंदिरात फक्त हिंदूंना कामावर ठेवायला पाहिजे. जर दुसऱ्या धर्माचे लोक सध्या तिथे काम करत असतील तर त्यांच्या भावना न दुखावता त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली पाहिजे”, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
|
|
दरम्यान, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या एका निर्णयालाही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्थगिती दिल्याचं सांगितलं. एमआरकेआर आणि मुमताज बिल्डर्सच्या हॉटेल डेव्हलपर्सना तिरुपतीमधील ३५ एकर जमीन देण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केला. हा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात झाला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला निर्णय चर्चेत
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने १८ हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय चर्चेत आला होता. काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडूंनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं होतं.
शहर
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
गुन्हा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




