Ayushman Card: आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी आयुष्यमान कार्ड आरोग्य सुरक्षा सुविधा ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते. यादीत असलेल्या खासगी रुग्णालयात ही सुविधा देण्यात येते. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की या कार्डचा उपयोग वर्षभरात किती वेळा करता येतो. वर्षभरात अनेकदा घेता येतो का 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? काय सांगतो नियम?
उपचारांच्या संख्येवर कोणतीही निश्चित मर्यादा नाही
योजनेतंर्गत उपचारांच्या संख्येवर मर्यादा नाही. उपचारांची कोणतीच निश्चित मर्यादा नाही. लाभार्थी त्याच्या गरजेनुसार, वर्षभरात अनेकदा कार्डचा वापर करता येतो. पण हा खर्च करण्यासाठी पाच लाखांची मर्यादा निश्चित आहे. पाच लाखांच्या मर्यादेत वार्षिक खर्च करता येतो. म्हणजे या योजनेतंर्गत पाच लाखांच्या मर्यादेपर्यंत जितक्यांदा गरज आहे, तोपर्यंत उपचार घेता येतो.
कसे तयार करता येते हे कार्ड
आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी अर्जदाराला जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल. तिथे ऑपरेटर अगोदर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासतो. तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थी काही वेळेत आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो.
गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी योजना
ही योजना खास करून गरीब आणि गरजू कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. जे लोक संघटित क्षेत्रासाठी काम करतात. नियमीतपणे आयकर भरतात. पगारदार आहेत आणि त्यांचा पीएफ कपात होते. ते या योजनेसाठी पात्र समजल्या जातात. तर ईएसईसी (ESIC) लाभ घेणाऱ्या आणि सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. हे सर्व या योजनेच्या परीघाबाहेर आहेत.
या कागदपत्रांची आवश्यकता
आधार कार्ड
रेशन कार्ड
इनकम सर्टिफिकेट
मोबाइल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
आयुष्यमान भारत योजनेसाठी असा करा अर्ज
आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत साईटला भेट द्या.
नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ अथवा ‘Apply’ येथे क्लिक करा.
नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड ही माहिती नोंदवा.
सर्व कागदपत्रे अपलोड करा.
पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

