Ayushman Card: आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी आयुष्यमान कार्ड आरोग्य सुरक्षा सुविधा ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते. यादीत असलेल्या खासगी रुग्णालयात ही सुविधा देण्यात येते. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की या कार्डचा उपयोग वर्षभरात किती वेळा करता येतो. वर्षभरात अनेकदा घेता येतो का 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? काय सांगतो नियम?
उपचारांच्या संख्येवर कोणतीही निश्चित मर्यादा नाही
योजनेतंर्गत उपचारांच्या संख्येवर मर्यादा नाही. उपचारांची कोणतीच निश्चित मर्यादा नाही. लाभार्थी त्याच्या गरजेनुसार, वर्षभरात अनेकदा कार्डचा वापर करता येतो. पण हा खर्च करण्यासाठी पाच लाखांची मर्यादा निश्चित आहे. पाच लाखांच्या मर्यादेत वार्षिक खर्च करता येतो. म्हणजे या योजनेतंर्गत पाच लाखांच्या मर्यादेपर्यंत जितक्यांदा गरज आहे, तोपर्यंत उपचार घेता येतो.
कसे तयार करता येते हे कार्ड
आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी अर्जदाराला जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल. तिथे ऑपरेटर अगोदर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासतो. तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थी काही वेळेत आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो.
गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी योजना
ही योजना खास करून गरीब आणि गरजू कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. जे लोक संघटित क्षेत्रासाठी काम करतात. नियमीतपणे आयकर भरतात. पगारदार आहेत आणि त्यांचा पीएफ कपात होते. ते या योजनेसाठी पात्र समजल्या जातात. तर ईएसईसी (ESIC) लाभ घेणाऱ्या आणि सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. हे सर्व या योजनेच्या परीघाबाहेर आहेत.
या कागदपत्रांची आवश्यकता
आधार कार्ड
रेशन कार्ड
इनकम सर्टिफिकेट
मोबाइल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
आयुष्यमान भारत योजनेसाठी असा करा अर्ज
आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत साईटला भेट द्या.
नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ अथवा ‘Apply’ येथे क्लिक करा.
नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड ही माहिती नोंदवा.
सर्व कागदपत्रे अपलोड करा.
पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




