
मुंबई :- भारत - पाकिस्तान सामन्यात राखीव दिवशी भारताने 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानवर 228 धावांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करून पहिल्या स्थानावर स्थानापन्न आहे . भारताने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने 32 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. तर उर्वरित 2 फलंदाजांना दुखापत असल्याने ते बॅटिंगसाठी येऊ शकले नाहीत. अशा प्रकारे भारताचा ऐतिहासिक विजय झाला.
इंडियाकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी 1-1 विकेट घेतली. त्याआधी विराट कोहली-केएल राहुल या जोडीने नाबाद शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. टीम इंडियाने या आधारावर 50 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना राखीव दिवशी सुरू आहे. पहिल्या दिवशी सामना २४ षटकानंतर थांबवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाला तेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली हे मैदानात होते. विराटने या सामन्यात शतक झळकावलं.. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा माइलस्टोन गाठला. वनडेमध्ये विराट कोहलीने १३ हजार धावा केल्या आहेत. विराटने कमी डावात ही कामगिरी करताना सचिन तेंडुलकरला याबाबतीत मागे टाकलंय. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेसुद्धा १३ हजार धावांचा टप्पा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गाठला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १३ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ३२१ डावात १३ हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराट कोहलीने ही कामगिरी अवघ्या २६७ डावात केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत २७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने ९० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने वैयक्तिक सर्वोच्च १८३ धावांची खेळी पाकिस्तानविरुद्ध साकारली होती. आतापर्यंत त्याने ४७ शतके आणि ६५ अर्धशतके केली आहेत
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




