मुंबई: मुंबई महानगरपालिकेत (BMC) गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्यांची (Consultants) नियुक्ती करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालिकेच्या प्रत्येक कामात सल्लागारांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करत स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांच्या तीव्र आक्षेपानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी सल्लागार नेमणुकीचे सर्वच्या सर्व प्रस्ताव मागे ठेवले (रोखले) आहेत.
प्रशासनाच्या उत्तरांवर सदस्यांची नाराजी:
याआधी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पालिकेतील सल्लागारांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सल्लागारांवर अबतपर्यंत नेमका किती निधी खर्च झाला, याची सविस्तर यादी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. असे असतानाही, बैठकीत प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन सल्लागार नेमणुकीचे चार वेगळे प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले.
"उद्या अर्थसंकल्प मांडायलाही सल्लागार नेमाल!"
बैठकीत पाणीपुरवठा प्रकल्पांशी (भांडूप, गुंदवली आणि मनोरी) संबंधित सल्लागार नियुक्तीचे चारही प्रस्ताव एका विशिष्ट कंपनीलाच कंत्राट देण्याच्या हेतूने आणल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला. यावर सभागृह नेत्यांनी प्रशासनाला अत्यंत खोचक टोला लगावला. "जर पालिकेच्या अभियंत्यांकडे क्षमता असतानाही प्रत्येक कामासाठी सल्लागारच आणायचे असतील, तर हे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे. नाही तर उद्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Budget) तयार करण्यासाठी आणि तो सादर करण्यासाठीही तुम्ही सल्लागार नेमाल", अशी संतप्त टीका त्यांनी केली.
पिसे-पांजरपूर प्रकल्पाचा प्रस्तावही अडकला:
यापूर्वी प्रशासनाने पिसे-पांजरपूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमता वाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी सल्लागाराला तब्बल २३ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आणला होता, जो सदस्यांच्या विरोधामुळे आधीच बाजूला ठेवावा लागला होता. पालिकेत सल्लागार उदंड झाले असून मग पालिकेच्या स्वतःच्या अभियंत्यांना बढती कशासाठी द्यायची, असा थेट सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. वाढत्या विरोधामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी सध्या हे सर्व प्रस्ताव स्थगित ठेवले आहेत.
शहर
- पावसाचा कहर! भाजी आणायला गेलेल्या वैभववाडीच्या युवकाचा मुंबईतील साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
- पुणे: ७२ दरडग्रस्त गावांचा प्रश्न कायम! फक्त ४४ गावांना पुनर्वसनाची मंजुरी, २२ ठिकाणीच काम सुरू
- केडीएमसी रुग्णालयातील मारहाणीचे पडसाद: शिवसेनेच्या नगरसेवकाने मारहाण केल्याने दोन डॉक्टरांचे राजीनामे
- मुंबई विद्यापीठाचा दणका! पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांची कमतरता असलेल्या ३० बी.एड. महाविद्यालयांची संलग्नता रद्द
महाराष्ट्र
- पावसाचा कहर! भाजी आणायला गेलेल्या वैभववाडीच्या युवकाचा मुंबईतील साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
- पुणे: ७२ दरडग्रस्त गावांचा प्रश्न कायम! फक्त ४४ गावांना पुनर्वसनाची मंजुरी, २२ ठिकाणीच काम सुरू
- केडीएमसी रुग्णालयातील मारहाणीचे पडसाद: शिवसेनेच्या नगरसेवकाने मारहाण केल्याने दोन डॉक्टरांचे राजीनामे
- मुंबई विद्यापीठाचा दणका! पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांची कमतरता असलेल्या ३० बी.एड. महाविद्यालयांची संलग्नता रद्द
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/nxdZr