पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडावा, अशी ही घटना ऐकून तुमचंही डोकं सुन्न होईल. एका नराधम आजोबानेच आपल्या ९ वर्षांच्या चिमुरड्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.पुण्यातील पर्वती पायथा परिसरात ही घटना घडली. ५० वर्षांच्या एका व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीला निर्जनस्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'. त्याच वेळी काही स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. नागरिकांनी आरडाओरडा करताच त्या नराधमाचे काळे कृत्य उघड झाले आणि त्या चिमुरडीचा जीव वाचला. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता शेकडो नागरिक तिथे जमा झाले. संतापलेल्या जमावाने या नराधमाला चांगलाच चोप दिला. "त्याला आमच्या हवाली करा," अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. सध्या या नराधमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला आमचा सवाल आहे की: अशा नराधमांना कायद्याचा धाक का उरलेला नाही? लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे असूनही, त्यांची अंमलबजावणी करण्यात आपण कुठे कमी पडतोय का? अशा प्रवृत्तींना समाजात मोकाट फिरू न देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशीची शिक्षा का दिली जात नाही? आणि समाजाला आमचा सवाल आहे की: आज घराबाहेरच नाही, तर रक्ताच्या नात्यातही आपली मुलं सुरक्षित नाहीत का? जर त्या दिवशी नागरिकांनी सतर्कता दाखवली नसती, तर त्या चिमुरडीचं काय झालं असतं? आपण आपल्या पाल्यांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' बद्दल वेळीच जागरूक करतोय का? तुमचं याबद्दल काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा, पुणे न्यूज. धन्यवाद.

छत्रपती संभाजीनगर हादरले! ६ वर्षीय चिमुरडीचा शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडावा, अशी ही घटना ऐकून तुमचंही डोकं सुन्न होईल. एका नराधम आजोबानेच आपल्या ९ वर्षांच्या चिमुरड्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.पुण्यातील पर्वती पायथा परिसरात ही घटना घडली. ५० वर्षांच्या एका व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीला निर्जनस्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'. त्याच वेळी काही स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. नागरिकांनी आरडाओरडा करताच त्या नराधमाचे काळे कृत्य उघड झाले आणि त्या चिमुरडीचा जीव वाचला.
 बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता शेकडो नागरिक तिथे जमा झाले. संतापलेल्या जमावाने या नराधमाला चांगलाच चोप दिला. "त्याला आमच्या हवाली करा," अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. सध्या या नराधमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाला आमचा सवाल आहे की:
अशा नराधमांना कायद्याचा धाक का उरलेला नाही?
लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे असूनही, त्यांची अंमलबजावणी करण्यात आपण कुठे कमी पडतोय का?
अशा प्रवृत्तींना समाजात मोकाट फिरू न देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशीची शिक्षा का दिली जात नाही?
आणि समाजाला आमचा सवाल आहे की:
आज घराबाहेरच नाही, तर रक्ताच्या नात्यातही आपली मुलं सुरक्षित नाहीत का?
जर त्या दिवशी नागरिकांनी सतर्कता दाखवली नसती, तर त्या चिमुरडीचं काय झालं असतं?
आपण आपल्या पाल्यांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' बद्दल वेळीच जागरूक करतोय का?
तुमचं याबद्दल काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा, पुणे न्यूज. धन्यवाद.छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालशी गावातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तनुजा रवी राठोड या ६ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह एका शेततळ्यात आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा ही दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर गावातील एका शेततळ्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले.

पोलिस तपास आणि संशय:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सुरुवातीला हा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी ही हत्या आहे की अपघाती मृत्यू, याबाबत पोलिसांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तनुजाच्या निधनामुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्पाप चिमुरडीचा अशा प्रकारे अंत झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाचा छडा लावून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *