नाशिक: हातात मोबाईल आणि डोळ्यासमोर इंटरनेटचे आभासी जग... याच धुंदीत सभोवतालच्या धोक्याचे भान हरपल्याने नाशिकमध्ये एका १७ वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. घराच्या बाल्कनीत उभे राहून मोबाईलवर सर्फिंग करत असताना अचानक तोल गेल्याने हा तरुण थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, अरबाज सलीम खान (वय १७) हा तरुण नाशिकच्या भद्रकाली परिसरातील शिंगाडा तलाव जवळील म्हसोबावाडीत राहतो. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अरबाज आपल्या घराच्या बाल्कनीत मोबाईल पाहत उभा होता. तो मोबाईलमध्ये इतका मग्न होता की, त्याला आपण बाल्कनीच्या अगदी टोकाला आहोत याचे भान राहिले नाही. त्याच वेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला.
प्रकृती चिंताजनक:
चौथ्या मजल्यावरून पडत असताना अरबाज मधल्या मजल्यावरील एका पत्र्याच्या शेडवर आदळला आणि त्यानंतर जमिनीवर पडला. पत्र्याचा मोठा आवाज आणि अरबाजचा आक्रोश ऐकून शेजारी राहणाऱ्या ध्रुगेश यादव यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरबाजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अतिदक्षता विभागात उपचार:
या भीषण अपघातात अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी त्याचे कुटुंबीय कामासाठी बाहेर गेले होते.
पोलिसांचा तपास:
या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मोबाईलमध्ये अति मग्न असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईल वापरताना सुरक्षिततेचे भान ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




